तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी पाऊसामुळे संपर्क तुटलेल्या गावची केली पाहणी .

कंधार ; प्रतिनिधी

तहसिलदार व्यंकटेश मुंडे व नायब तहसिलदार विजय चव्हाण यांनी पाऊसामुळे संपर्क तुटलेल्या भोजुचीवाडी गावची आज गुरुवार दि.२२ रोजी पाहणी केली.

पाऊसामुळे कंधार तालुक्यातील वाडी तांड्याचा संपर्क तुटल्याची खबर मिळताच ताबडतोब सदरील ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व संबधित विभाग प्रमुख यांना सुचना दिल्या. सोबत मंडळी अधिकारी शेख साहेब मन्मथ थोटे समन्वय व सरपंच सतिश देवकते व गावकरी उपस्थित होते.दरम्यान पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण यांनीही पाहणी करुन तात्काळ प्रशासनाने रस्ताचा कायमचा प्रश्न मिटण्यासाठी पुल बांधण्याची विनंती केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *