ग्रामीण पत्रकारितेतला मन्याडी कोहिनुर ; पत्रकार धोंडीबा बोरगावे..

वयाच्या ६ व्या वर्षी म्हणजेच ६ आक्टोबर १९८६ रोज सोमवारी घटस्थापनेच्या दिवशीच आईचे छत्र गमावलेल्या आणि अगदी लहानपणापासूनच अनेक संकटांचा सामना करत संघर्षमय जीवनाची वाटचाल करतांना पत्रकार धोंडीबा बोरगावे यांनी वेगवेगळ्या वर्तमानपञातुन लिखाण करत आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत अनेकांना न्याय मिळवून देत जनमाणसात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली व सबंध वाचकांच्या प्रेरणा मिळवत अखंड सकारात्मक सेवा देणारे पत्रकार म्हणून आपली ओळख निर्माण केली. त्याच संघर्ष योद्धा चा आज २ ऑक्टोबर हा जन्मदिवस..

पत्रकारिते सोबतच गेली काही वर्षांपासून जनसेवेसाठी ते राजमाता बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्यामाध्यमातून जनहितार्थ कामे करत ग्रामीण भागात अनेक सामाजिक चळवळीतून आपली वेगळी ओळख निर्माण केली व ते एक निर्भीड पत्रकार म्हणून ही परिचित आहेत .

 

 

फुलवळ पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून सतत अनेक वेळा पदभार सांभाळत पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकारणीचे पदसिद्ध सदस्य तसेच कंधार तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आदी पदावर ते आज कार्यरत असून आपल्या सर्व सहकारी पत्रकार बांधवाना सोबत घेऊन नांदेड जिल्ह्यात ग्रामीण भागातील पहिले पत्रकार भवन फुलवळ सारख्या ग्रामीण भागात मंजूर करून घेऊन पत्रकारिता क्षेत्रातही त्यांनी स्वतःची व फुलवळ पत्रकार संघाची एक आगळीवेगळी ओळख निर्माण केली.

 

 

अशा या सकारात्मक विचार श्रेणीचा व लढवय्या पत्रकाराचा २ ऑक्टोबर हा जन्मदिवस होय, तेंव्हा त्यांना उर्वरित निरोगी आयुष्यासाठी व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतांना एवढेच म्हणेन आई तुळजाभवानी त्यांना व त्यांच्या लेखणीला हत्तीचे बळ देवो हिच सदिच्छा.

धोंडीबा ऊर्फ बंडु बाबाराव बोरगावे यांची जन्म तारीख २ आक्टोबर १९७९ होय.. ते आज २ आक्टोबर रोजी नव्या उमेदीने पुढच्या जीवन प्रवासात ते पदार्पण करत आहेत.

 

 

 

अगदी लहानपणी वयाच्या ६ व्या वर्षी म्हणजेच ६ आक्टोबर १९८६ रोज सोमवार , मंगलमय दिवस , घटस्थापनेच्या दिवशीच त्यांच्यावरील आईचे छत्र त्यांना कायमचे गमवावे लागले . तेंव्हा पासून त्यांनी अत्यंत कठीण परीस्थितीमध्ये वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत कसेबसे B Sc पर्यंतचे शिक्षण पुर्ण करत पत्रकारितेचे व्रत स्वीकारले , पण संघर्ष त्यांच्या पाचवीलाच पुजलेला असावा असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

 

 

 

१ डिसेंबर २००० रोजी पुण्यनगरी या वर्तमान पत्राच्या माध्यमातून पत्रकारीतेला प्रारंभ केला.
२००० ते २००४ पुण्यनगरीचा प्रतिनिधी म्हणुन काम केले आणि
२००४ ते २००७ या कालावधीत देशोन्नतीला वार्ताहर म्हणून काम केले .
२००७ पासुन आज पर्यंत सकाळ या लोकप्रीय दैनिकामध्ये मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत असतांनाच वाचकमंच , वतनवाला सारख्या अशा अन्य अनेक दैनिकांत त्यांच्या बातम्यांना प्रामुख्याने स्थान मिळते हा त्यांच्या लेखणीचा प्रभाव आणि त्या त्या दैनिकांच्या प्रमुखांशी असलेले त्यांचे सलोख्याचे संबंध असल्याचे प्रतीक आहे .

 

 

 

आजपर्यंत अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत अनेकांना न्याय मिळवून देत जनमाणसात आपली वेगळी ओळख निर्माण करतांना सबंध वाचकांच्या प्रेरणा घेत पञकारीतेला बळ दिले , एवढेच नाही तर राजमाता बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करत असतांना अनेक सामाजिक उपक्रम राबवत जनहीतांची कामे केली .

 

 

नांदेड जिल्हात सर्व तालुक्यात कंधार तालुक्यातील फुलवळ ची वेगळी ओळख निर्माण करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. तर दरवर्षी पञकारीतेच्या माध्यमातून विविध सामाजीक उपक्रम राबवत चागंले काम करणाऱ्या अधिकारी , शेतकरी व गुणवंताचा सत्कार करुन त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप मारुन कौतुक केले. जिल्हातील सर्व पञकारांना अनेकवेळा फुलवळ येथे बोलावून विशेष कार्यक्रम घेत त्यांच्या सन्मान , सत्कार केला. परीणाम म्हणजे फुलवळची बातमी सर्व प्रथम लागणार व तेही सन्मानाने अशी ओळख बंडु ऊर्फ धोंडीबा बोरगावे यांनी आपल्या सोबती पञकारांच्या मदतीने केली.

 

 

 

धोंडीबा बोरगावे म्हणजे एक अजब रसायण च आहे. होय अजब रसायण या करीता म्हणावे लागेल की, अगदी लहाणपना पासुनच अनेक संकटांचा सामना करत संघर्षमय जीवन जगताना अगदी पाच ते सहा वर्षाचा असताना आईच्या मायेला मुकलेले , वडील अशिक्षित व घरची सामान्य परिस्थिती असताना ही ह्या माणसाला सामाजिक कार्याची वेगळीच ओढ असल्याचे कायमच दिसते हे विशेष. सर्वांशी मनमोकळा संवाद व भाषा कौशल्यावर प्रभुत्व मिळवत त्यांनी आजपर्यंत आपल्या सारखी अनेक माणसे आपलीशी करून घेत प्रत्येकासोबत जिव्हाळ्याचे संबंध जोडले आणि जोडलेले नातेसंबंध टिकवत स्वतःच एक वलय त्यांनी निर्माण केलं तसेच गावातील सर्वांची जन्मभूमीशी नाळ जोडून राहावी यासाठी फुलवळ ची चळवळ या वॉट्सअप ग्रुप च्या माध्यमातून गावातील व परिसरातील अनेकांना जोडून ठेवले.

 

 

 

कसेबसे पदवी पर्यंत शिक्षण घेवुन आपल्या करियर ला सुरुवात करत असताना अगदी कमी वयापासूनच या माणसाच्या अंगातील सामाजिक कार्याची भावना , ओढ काही कमी झालीच नाही. हालाकीच्या परिस्थिती चा सामना करत प्रत्येक संकटांना तोंड देत आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी सदैव धडपड चालूच ठेवली आणि आज घडीला त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना इंजिनिअरिंग चे पदवी पर्यंत चे शिक्षण देण्यात ते यशस्वी ठरत असून सतत त्यांनी प्रत्येकाने स्वावलंबी बनावे असा मोलाचा सल्लाही अनेकांना दिला. सोबतच आपली जीवनगाथा मांडणारे ( दुःखाच्या खाईत नशीबाशी झुंज देताना..) या आत्मचरित्राचे लिखाण करत असून ते लवकरच पूर्ण करणार आहेत. त्यात एकंदरीत स्वतःचे बालपण ते आजपर्यंतच्या जीवन प्रवासाचा लेखाजोखाच त्यांनी मांडला आहे.

 

 

 

त्यांनी आपल्या भागात वेगवेगळ्या कल्पना मांडत अनेक उपक्रम राबवत आईच्या स्मरर्णार्थ योग प्राणायाम चे शिबीर घेणे, राजमाता बहुद्देशीय सेवा भावी या सामाजिक संस्थेची स्थापना करुन संस्थे च्या माध्यमातुन वेगवेगळे उपक्रम राबवुन सुशिक्षित महीलांना स्वांवलंबी बनवण्यासाठी शिवणकला चालवणे, दै. सकाळ च्या माध्यमातुन नदी पात्रातील गाळ काढणे, जवळ बसलेल्या युवकांना मोलाचा व सबुरीचा सल्ला देत स्वावलंबी कसे बनावे याबद्दल त्यांचे मत परिवर्तन करणे व त्यांना सकारात्मक बनवणे हे ते कटाक्षाने करतात.

 

 

 

एवढेच नाही तर आपल्या गावासाठी नेहमीच काही ना काही नवनवीन करता येते का याचा सदैव ध्यास धरून ते आजही त्याच उमेदीने वेगवेगळी कामे करतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी जुनेगावठाण ची फेर आकारणी करून नव्याने नमुना नं आठ मध्ये नोंद करावी , तसेच फुलवळ हे आता मुख्य राष्ट्रीय महामार्ग वर आल्याने गावाच्या विकासात्मक वाढीसाठी गावात आठवडी बाजार भरवावा अशी रीतसर मागणी केली होती. त्या दोन्ही मागण्यांना यश आले असून मंजुरीही मिळाली आहे. जेंव्हा केंव्हा हे दोन्ही मंजूर मागण्या स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत मनावर घेऊन कार्यरत करेल तेंव्हाच या मागण्यांचे मोल इतरांना पटेल आणि त्याचे महत्व अनेकांना कळेल यात शंकाच नाही.

 

 

 

हे सर्व करत असताना जन सामान्यांची वर्तमान पत्रांद्वारे
व्यथा मांडत न्याय मिळवून देणारा पत्रकार म्हणुनही त्यांचा मोठा नाव लौकीक आहे व अनेकवेळा न्यायाप्रति अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहेच यात तिळमात्र शंका नाही.

 

 

खरच ग्रामिण भागात राहुन कोणताही राजकीय वारसा नसताना. कोणतीही राजकीय भुक मनासी नसता , समाजा प्रती प्रांजळ काम करण्याची भावना असणारा हा आणि हाच माणुस असु शकतो.

म्हणुनच म्हणावेसे वाटते की या माणसाला आजपर्यंत मिळालेले अनेक पुरस्कार हे अभिमानास्पदच असून त्यांच्या योग्य कार्याची दखल घेणारेच ते सर्व पुरस्कार आहेत.

आजपर्यंतच्या काळात त्यांच्या कार्याची दखल घेत सन्मानाचे त्यांना मिळालेले पुरस्कार खालीलप्रमाणे आहेत.

1) नवोदय बहुद्देशीय सेवाभावी संस्था कडून २०१२- १३ मध्ये उत्कृष्ट पत्रकारीतेचा पहिला पुरस्कार..

 

 

2) उदगीर तालूका पत्रकार संघाकडून देण्यात येणारा मराठवाडा स्तरीय उत्कृष्ट वार्ता प्रथम पुरस्कार २०१४- १५ मध्येच त्यांनी मिळवत लेखणीची धार कायम ठेवत समाजमन जाणून घेत न्याय प्रविष्ठ बातम्या प्रकाशित करण्याची धडपड सुरूच ठेवली.

३) २०२० मध्ये कोरोना च्या महामारीत उल्लेखनीय कामगिरी बाजावल्याबद्दल भाजपा महाराष्ट्र महिला कार्यकारिणी कडून कोरोना योद्धा तर नांदेड मित्रमंडळ संस्था औरंगाबाद च्या वतीने कोरोनावीर या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

 

 

 

वयाच्या ६ व्या वर्षी आईच्या मायेला मुकले पण परंतु तुमच्या , आपल्या सारख्या असंख्य वाचकप्रेमी व मित्रपरीवाराने त्यांना भरभरून दिलेल्या प्रेमरूपी मायेतून त्यांनी लेखणीच्या च्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळावा यासाठी सतत धडपड करत फुलवळ येथील नदीलाही सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून त्यांनी पुनर्जीवित करण्यासाठी जलयुक्त शिवारचे मोठे काम पुर्ण केले होते. अशा या लेखनीबहाद्दर पञकारांना उदंड आयुष्य लाभो. त्यांच्या लेखणीची धार अशीच तळपत राहो हीच सदिच्छा , पुन्हा एकदा जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *