कंधार : दि.७ ( निलेश गायकवाड)
विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्धांना जेथे ज्ञानप्राप्ती झाली ते बुद्धगया येथील प्राचीन महाबोधी महाविहार हे भारतासह जगभरातील बौद्धांचे सर्वोच्च पवित्र श्रद्धास्थान आहे.त्यामुळे १९४९ च्या ॲक्ट मध्ये तात्काळ दुरुस्ती करून महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्यावे.अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तालुका शाखा कंधारच्या वतीने तहसीलदार कंधार यांच्यामार्फत भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू व बिहार राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
देशातील हिंदुच्या मंदिराची देखभाल करण्यासाठी हिंदुचेच लोक असतात.मुस्लीमांच्या मस्जीदीची देखभाल मुस्लीमच करीत असतात.जैन मंदिराची देखभाल जैन लोकच करीत असतात.त्या अनुषंगाने तथागत गौतम बुध्द यांची जन्मभुमी असलेल्या बुध्दगया बौध्दांच्याच हातात का.?असू नये असा न्यायिक सवालही महामहिम राष्ट्रपतींना केला आहे.भगवान गौतम बुद्धांच्या सदरील त्या ठिकाणाचे ब्राम्हणीकरण करण्याचा प्रयत्न केला जात असून त्यामुळे समस्त बौध्द धर्मियांच्या भावना दुखावल्या जात आहेत.
बुध्दगया येथे गेल्या १५ दिवसापासून बौध्द भिक्खु व बौध्द समाजाच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंदोलन,उपोषण सुरु आहे.भारतासह जगभरातील सर्व बौध्दांनीं या आंदोलनाला पाठींबा दिलेला आहे.करिता आपण त्वरीत यांच्या भावनेचा विचार व आदर करुन १९४९ च्या व्यवस्थापन ॲक्ट मध्ये तात्काळ दुरुस्ती करुन बुध्दगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घ्यावे.असेही सदरील निवेदनात नमुद केले आहे.या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव रुपेश कांबळे,सहसचिव अहेमद पठाण,प्रसिद्धीप्रमुख भास्कर कदम,राणाप्रताप पवळे,महेंद्र गायकवाड,मनोहर सिंनगारपुतळे,राहुल कदम,कृष्णा गायकवाड,विठ्ठल जाधव,सुनील कांबळे,गंगाधर गायकवाड,धम्मपाल वाघमारे,गंगासागर दिग्रसकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

