*कंधार प्रतिनिधी संतोष कांबळे*
——————–
ढोंगी सत्ताधाऱ्यांनी पाण्याचे राजकारण करुन जनतेची दिशाभूल करु नये. अन्यथा जनअंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख परमेश्वर जाधव यांनी दिला.केंद्र व राज्यामध्ये महायुतीचे सरकार असताना लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील जनता पाण्याअभावी त्रस्त असताना सत्तेतील माजी मुख्यमंत्री, खासदार, आमदार व स्थानिक पुढारी अंतेश्वर बंधाऱ्यातून अहमदपुर येथे जाण्याऱ्या पाणी प्रश्नावरुन कलगीतुरा करुन जनतेला फसवण्याचे काम करत आहेत. तसेच कंधार तालुक्यातील बारुळ मनार प्रकल्पातून उदगीर तालुक्यातील ९१ गावे, जळकोट तालुक्यातील ३८ गावे जि.लातुर येथे पाणी पळवले जात असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कंधार तालुका शाखेने संभाजी बिग्रेडला सोबत घेऊन अनेक वेळा काम बंद केले आणि पाठपुरावा सुरू केला.
मात्र सत्ताधारी खासदार, आमदार पूर्वी विरोधात असलेले आणि आता मुख्यमंत्री असलेल्या पक्षातील स्थानिक पुढारी बारूळ येथील मनार प्रकल्पातून पळवले जाणारे पाण्यासंदर्भात ठोस आक्रमक भूमिका न घेता गप्प का राहीलात यांचा जबाब कंधार व लोहा तालुक्यातील जनतेस दयावा.
केंद्रामध्ये व महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार असून भाजपचा मुख्यमंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अर्थमंत्री व नांदेड जिल्ह्याचा भाजपाचा बडा नेता माजी मुख्यमंत्री यांनी पत्र काढून न थांबता आणि लोहा विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार व स्थानिक भाजपा पुढाऱ्यांनी कोणात किती दम आहे. कोणाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे वजन आहे. कंधार व लोहा तालुक्यातील जाणारे पाणी थांबवून दाखवावे आणि ढोंगीपणा सोडून जनाची नसेल तर मनाची लाज धरून जनतेची व शेतकऱ्यांची दिशाभूल करने बंद करावे.
पिण्यासाठी पाणी देण्यास हारकत नाही. मात्र कंधार व लोहा तालुका तान्हलेला असताना, कंधार शहरास २ दिवसाआड पाणी येत आणि कंधार तालुक्यातील मुखेड विधानसभेतील कुरूळा व पेठवडज सर्कलमध्ये कायम तीव्र पाणीटंचाई असताना नेते व त्यांचे चमचे गप्प का? यांच्या स्वार्थी वागण्याने महाराष्ट्रातील एकमेव लालकंधारी केंद्र कंधार तालुक्यातील गऊळ येथे असून, तसेच आपल्या भागात लालकंधारी जनावराची संख्या सर्वाधिक आसताना हे केंद्र आंबाजोगाई जि.बीड येथे स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहे. हा लोक प्रतीनिधीचा नाकर्तेपणा आहे. सत्ताधाऱ्यांनी तात्काळ कलगीतुरा, जनतेची व शेतकऱ्यांची दिशाभुल थांबवून न्याय नाही दिल्यास शिवसेना जनतेस सोबत घेऊन जनअंदोलन करेल, असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख परमेश्वर जाधव यांनी दिला.

