कंधार (प्रतिनिधी)
लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपल्या मतदारसंघातील मतदारांचे वेळेवर काम झाले पाहिजे व नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मतदारसंघातील सर्कलच्या गावात गावकऱ्यांशी संवाद साधता यावे. यासाठी तालुक्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना सोबत घेऊन जनता दरबार भरवण्याची संकल्पना आखली आहे. त्यात नवीन रेशनिंग कार्डचे वाटप समस्या, श्रावणबाळ योजनेअंतर्गत निराधार महिलांच्या समस्या सोडवता आले पाहिजे, शेतकऱ्यांच्या जागेवरती वारस नोंदी करण्यात आल्या पाहिजे त्याचबरोबर महसूल, शैक्षणिक, भूमापण, इत्यादीचे अनेक प्रकरने जाणुन घेण्यासाठी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जणता दरबार सुरू केला.
कंधार तालुक्यातील ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडवण्याच्या अनुषंगाने आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली आज दि ३० एप्रिल रोजी कंधार तालुक्यातील बारूळ येथे एक दिवस गावकऱ्यांसोबत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी व त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी (जनता दरबार) चे आयोजन केले आहे. या जनता दरबारमध्ये प्रशासनातील सर्वच विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. ग्रामस्थांच्या अडीअडचणी जागेवर सोडवण्यासाठी या जनता दरबारमध्ये निर्णय घेण्यात येणार आहेत. त्यामुळे कंधार तालुक्यातील कौठा व बहादरपुरा सर्कल मधील सर्व ग्रामस्थांनी या जनता दरबारमध्ये उपस्थित राहावे असे आवाहन लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

