घरकुलाचे पैसे मिळत नसल्याने कंधार बिडिओच्या दालनात ठिय्या आंदोलन ; कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नारायण गायकवाड यांनी वेधले लक्ष
Post Views: 56
कंधार ;( दिगांबर वाघमारे )शासनाच्या वतीने ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना घर मिळावे यासाठी घरकुल योजना मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. घरकुल मंजूर झाल्याने लाभार्थी आनंदित होत आहे परंतु काम करूनही अधिकारी घरकुलाचे बिल काढण्यात टाळाटाळ करत असल्याने घरकुल मिळालेत कशाला?अशी निराशाजनक भावना व्यक्त करत आहेत. एकीकडे घरकुलासाठी अर्ज मागवणे मोठ्या प्रमाणात चालू असताना 2016- 17 मध्ये बांधकाम केलेल्या घरकुलाचे आजही पैसे मिळाले नसल्याने लाभार्थी मोठ्या चिंतेत सापडले आहेत. पेठवडज ग्रामपंचायत अंतर्गत 2016 ते 17 मध्ये गेलेले घरकुलचे कामे पूर्ण झाले असतानाही त्याचे अद्यापही बिल निघाले नाही. ग्रामपंचायत कार्यालयाकडून वारंवार पंचायत समिती कार्यालयाकडे पाठपुरावा करूनही याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नारायण गायकवाड यांनी चक्क बिडिओच्या दलनात आंदोलन करून लक्ष वेधून घेतले .शासनाकडून घरकुल योजनेसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज मागवले जात आहे. या घरकुलाचे बिल काढण्यास संबंधित अधिकारी हे पैसे मागत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. घरकुल योजनेमध्ये लाभार्थ्यांपेक्षा संबंधित अधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याच्या जोरदार चर्चा सध्या चालू आहेत. कंधार तालुक्यात अनेक ठिकाणी घरकुल न बांधताच अधिकाऱ्यांना मॅनेज करून बिल उचलल्याच्याही तक्रारी समोर आले आहेत. ज्या लाभार्थ्याने पूर्णपणे प्रामाणिकपणे घर घरकुल बांधले आहे अशा लोकांना मात्र बिले काढण्यास टाळाटाळ केली जात असल्याचेही आरोपही केल्या जात आहे. शासनाकडून रेती देण्याचे आश्वासनही देण्यात आले होते परंतु ही रेती बघायला सुद्धा मिळत नाही अशी अवस्था घरकुल योजनेची झाली आहे. सन 2016 -17 पासून पेठवडज या गावांमध्ये जवळपास दोन हजार घरकुल मंजूर झाले असून त्याचे बिल निघत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामपंचायत कार्यालयाकडून अनेक वेळा बिल दाखल करूनही बिल मिळत नसल्याने लाभार्थी हे ग्रामपंचायती व सरपंचाकडे चक्रा मारून पैसे उचलून खाल्ल्याची बदनामी करत आहेत.त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी गावात येऊन सर्व घरकुल लाभधारकांना बोलवून त्यांना खरं काय आहे हे सांगून त्यांचे समाधान करावे या मागणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नारायण गायकवाड यांनी गटविकास अधिकारी यांच्या दलनात बसून काही वेळ आंदोलन केले.यावर अधिकारी यांनी गावात येऊन सविस्तर माहिती देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले..

