(मुखेड ; प्रतिनिधी )
ढगफुटीमुळे मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद परिसरामध्ये प्रचंड नुकसान झाले असून या नैसर्गिक आपत्तीमध्ये आमचे मित्र बालाजी खंखरे यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, त्यांच्या जवळपास 50 म्हैसी जे त्यांनी हरियाणावरून खरेदी केल्या होत्या गाई वासरे असे मिळून 65 पेक्षा जास्त जनावरे त्यांची दगावली असून,यामध्ये त्यांनी निर्माण केलेले तीन शेड जमिनदोस्त झाले आहे,ट्रॅक्टर खड्बाकुट्टी यासह अनेक अवजारे वाहून गेली आहेत जवळपास दीड कोटी चा नुकसान झाला आहे,शून्यातून व्यवसाय उभा करणाऱ्या एका तरुण शेतकऱ्यासाठी ही घटना खूपच वाईट आणि वेदनादायी आहे, बालाजी आप्पा खंकरे शून्यातून व्यवसायाची सुरुवात करून दुग्ध व्यवसाय चालू केला होता,त्यांचा व्यवसाय भरभराटीत आल्यानंतर अचानक निसर्ग कोपतो आणि संघर्षातून व्यवसाय उभा करणाऱ्या एका सुशिक्षित अल्पभूधारक शेतकऱ्यावर डोंगर कोसळतो…..
ही परिस्थिती प्रचंड नुकसानकारक तर आहेच परंतु एखाद्या व्यवसाय उभा करणाऱ्या तरुणांचा आत्मविश्वास मारणारी ही घटना आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातमी कळल्यानंतर मी लगेच कंधारून निघालो मुक्राबाद मध्ये पोहोचल्यानंतर समजल चळवळीच काम करणारे मन्मथ आप्पा खंकरे यांचेही प्रचंड नुकसान झालं आहे, त्यांचेही जनावर दगावल्याची बातमी कळल्यानंतर त्यांच्या शेताला भेट देऊन हिम्मत देण्याचा प्रयत्न केला….
अशाप्रकारे अनेक शेतकऱ्यांचे या भागामध्ये नुकसान झाले आहे,शासन स्तरावर पंचनामे होतील परंतु ही नैसर्गिक आपत्ती प्रचंड मोठी असून शासनाचे निकष बाजूला ठेवून अशा प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन मदतीची अत्यंत आवश्यकता आहे…. एवढ्या मोठ्या प्रमाणात जनावरे दगावले असून हे चित्र पहावत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी आहे….
हसनाल,रावणगाव,भासवाडी परतपूर,बामणी या गावांमध्ये पण प्रचंड नुकसान झाले असून अनेक ठिकाणी जीवित हानी झाली आहे अशी माहिती भाजपाचे भगवानराव राठोड यांनी दिली .

