कंधार ; (दिगांबर वाघमारे )
आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली आज कंधार येथे आढावा बैठक पार पडली अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला त्यावेळी नुकतेच कोटबाजार येथिल आजी माजी ग्रामपंचायत सदस्य मयत शेख नासेर शेख अमीन ,व त्यांच्या पत्नी विद्यमान ग्रामपंचायत सदस्या मयत शेख हसीना नसेर हे घरात झोपले असताना दि १५ ऑगस्ट रोजी रात्रीच्या बाराच्या सुमारास घराच्या पाठीमागील भिंत पडुन दोघांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला होता . या मयतांच्या कुटुंबियांना आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते आठ लाख रुपये किंमतीचा धनादेश वाटप करण्यात आला . यावेळी तहसिलदार रामेश्वर गोरे ,स्वप्नील पाटील लुंगारे , कोटबाजार ग्रामपंचायत चे सरपंच सदस्य उपस्थित होते .
राज्यासह तालुक्यात १४ ते १९ ऑगस्ट दरम्यान, अतिवृष्टी व मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे प्राथमिक अंदाजानुसार तब्बल २५ हजार ७५४ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात ६५ हजार ७४ हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे. यात ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, तिळ, कारळ, सुर्यफुल, कापूस, हाळद, आद्रक, भाजीपाला व इतर नगदी पिकांचा समावेश आहे. पिके वाढीच्या अवस्थेत असताना तालुक्यात १४ ते १९ ऑगस्ट दरम्यान, अतिवृष्टी व मुसळधार पाऊस झाला आहे. तर कंधार, कुरुळा, फुलवळ, उस्मानगगर, दिग्रस बु या ५ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अतिवृष्टी, मुसळधार व पूरपरिस्थितीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. घरांची पडझड झाली आहे. अनेक लहान-मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. तात्काळ सरसकट नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला यावेळी आढावा बैठकीत आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिले .

