कंधार ; (दिगांबर वाघमारे )
कंधार तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले . आस्मानी आणि सुलतानी संकट तेज झाले आहे आसमाणी संकट आपल्या हाती नाही. सरकार आपली यंत्रणा राबवत नाही निष्क्रीय सरकार व कामचुकार अधिकारी यामुळे आतापर्यंत मदत मिळाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे दखल घेण्यासाठी हा धडक मोर्चा आहे.धुऱ्यावर जावून पाहण्यासाठी जावून केवळ सहानुभूती नको तर भक्कम मदतीची गरज असून ओल दुष्काळ जाहीर करण्याची मागणी माजी आ. शंकरअण्णा धोंडगे यांनी केले.
कंधार अतिवृष्टीमुळे शेतकर्यांची झालेली नुकसान भरपाई त्वरीत मिळावी या मागणी साठी महाराष्ट्र राज्य समिती या पक्षाच्या वतीने आज ३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता भुईकोट किल्ला कोटबाजार येथून निघून शिवाजी चौक मार्गे उपविभागीय कार्यालयावर धडकला .
या पक्षाचे संस्थापक व माजी आ. शंकरअण्णा धोंडगे यांनी संबोधन करताना मी आमदार असताना झालेल्या अतिवृष्टीत शासनाकडून मदत मिळवून दिली होती . यावर्षी प्रंचड प्रमाणात पाऊस म्हणजे सुमारे 300 मिली मिटर पाऊस झाला आहे. लोहा कंधारचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सोबत असलेल्या संबंधावर मदत मिळवून द्यावी पक्ष फोडण्यासाठी चॅ अजित पवार यांच्या कानत बोलण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदतीचे ही कानात सांगाव केवळ सहानुभूती नको तर भक्कम मदतीची गरज आहे . शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी दिल्लीतून निधी आणणे आवश्यक आहे .
सरकारकडे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन निधी मुबलक प्रमाणात असतो आणि तो तातडीने वितरीत करून शेतक-यांना धीर देणे गरजेचे असते. सरकार मोठया प्रमाणात बि बियाने ,डाळी विदेशातून आयात करत आहे , त्यामुळे आपला शेतकरी अडचणीत येणार आहे .राज्य शासनाकडे निधीची कमतरता असेल तर केंद्र सरकारकडून त्वरीत निधी मंजूर करून घेण्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत केंद्र सरकार मदतही देत असते परंतू सद्या राज्यशासन या प्रकरणी उदासिन दिसून येत आहे. सर्वच बाबतीत महाराष्ट्र सर्व आघ्याड्यावर पुरुण उरणारा आहे परंतू सरकारची भूमिका नियती नुकसान भरपाई किंवा मदत करण्याची नाही .नेत्यांनी असे वागणे बरे नव्हे केवळ फोटो व इव्हेन्ट करण्यासाठी हे अतिवृष्टीचा प्रसंग नाही . वेळप्रसंगी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जेल भोगण्याची तयारीपण आहे . सरकारच्या नियतीत कितीही खोट असेल तरीही निधी मिळणार नाही तोपर्यंत उपोषण मोर्च काढत राहणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले . उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार रामेश्वर मोरे यांनी मोर्चा ठिकाणी येवून निवेदन स्विकारले .
दिलेल्या निवेदनात शेतकर्यांना सरसकट एकरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, शेतकर्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, नदी, ओढ्याकाठच्या खरडून गेलेल्या जमीनीसाठी प्रतिएकर एक लाख रुपये द्यावे, घराची पडझड, वाहून गेलेली जनावरे याची नुकसान भरपाई द्यावी, ओला दुष्काळ जाहीर करावा ,चालू वर्षातील पिक विमा तातडीने द्यावा अशा मागण्या करण्यात आले .
यावेळी दत्ता पवार , शिवाजी धानोरकर , प्रताप देशमुख , डी पी जाधव , बालाजी गिते ,दिलीप धोंडगे ,शिवराज धोंडगे आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

