अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे )
आज दि 29 फेब्रुवारी 2025 रोजी अनुसूचित जमातीच्या सवलतीसाठी अहमदपूर तालुक्यातील बंजारा समाजाचा तहसील कचेरीवर दुपारी 12 वाजता भव्य मोर्चा काढण्यात आला.माननीय तहसीलदार मॅडम यांना शिष्टमंडळातर्फे मागण्याचे निवेदन देण्यात आले.
यावेळी कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या वेळी मराठवाडा हा 1956 मध्ये संयुक्त महाराष्ट्रामध्ये सामील करण्यात आला आणि त्यानंतर 1976 मध्ये हैदराबाद स्टेटची जातीनिहाय जनगणना करण्यात आली. त्यामध्ये बंजारा समाजाला आदिवासी समाज म्हणून घोषित करण्यात आले. मराठवाडा जर हैदराबाद स्टेट मध्येच राहिला असता तर 1976 नंतर त्यांना आपोआप आदिवासीच्या सवलती मिळाल्या असत्या.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या आठव्या सूचीमध्ये बंजारा समाज हा आदिवासी समाज आहे . त्यांना आदिवासी सदृश्य सवलती दिल्या पाहिजेत. असे नमूद केले आहे.या दोन्ही गोष्टीच्या आधारे बंजारा समाज हा अनुसूचित जमातीच्या सवलती मिळण्याचा प्रबळ हक्कदार आहे.
त्यांनी असेही सांगितले की सध्या असलेल्या अनुसूचित जमातीच्या सात टक्के आरक्षणाला आमचा धोका नाही. आदिवासी सदृश्य सवलती आम्हाला घटनेनुसार देण्यात याव्यात.
प्रचंड जमलेल्या जनसमुदायासमोर नीलाकांत जाधव, साधनाताई राठोड, अॅड राहुल राठोड, दशरथ राठोड,नारायण आडे,संतोष जाधव, सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी,अण्णाराव सूर्यवंशी,एन डी राठोड यांनी आपले विचार मांडले.
हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी गेली महिनाभर रात्रंदिवस झटणारे शेषराव राठोड , गजानन राठोड, बालाजी चव्हाण, अरविंद राठोड ,राम राठोड, शिवाजी राठोड, विकास राठोड, विजय राठोड ,रावजी चव्हाण , संतोष जाधव, नाथराव राठोड ,विकास राठोड, राजाभाऊ राठोड, कृष्णा राठोड अभिजीत जाधव , सचिन जाधव, लक्ष्मण जाधव, धारबा राठोड, संतोष राठोड, कैलास चव्हाण, डॉ सचिन पवार आणि चंद्रकांत राठोड यांनी खूप मोठे परिश्रम घेतले .
कार्यक्रमाचे संचलन श्री एच आर राठोड यांनी केले तर आभार रामेश्वर जाधव यांनी मानले.

