तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी त्यांना ५० हजार रुपये प्रति हेक्टरी मदत द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन शिवसेना उबाटा च्या वतीने आज कंधार येथे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांना देण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख परमेश्वर पाटील जाधव, काँग्रेसचे कार्यकर्ते डॉ. गणेश पाटील पवळे, मा. सभापती पंडित देवकांबळे, गंगाधर पाटील पवळे, कैलास पाटील पवळे, ज्ञानेश्वर पाटील कांगटे आदी मान्यवर उपस्थित होते.