राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसापेक्षा ‘प्रेम’ मनात ठेवून हक्कांने रागावणारी माणसं कधी ही चांगली असतात.
प्रत्येक माणसाला जीवन जगताना मित्रांची गरज असते. त्यामध्ये दोन प्रकारची मित्र असतात. एक सारथी आणि दुसरे स्वार्थी असणारे म्हणून आपण जीवन जगते वेळेस मित्र ओळखता यावे. श्रीकृष्ण आणि सुदामा एकमेंकाचे जिवलग मित्र होते.सुदामाला कसलाही प्रकारचा स्वार्थ नव्हता आणि श्रीकृष्णाला जीवलग सुदामाची गरज होती.म्हणून यांची ही अतूट मैत्री अजरामर झाली. कर्ण आणि दुर्योधन यांच्या मैत्रीमध्ये स्वार्थ होता.दुर्योधनाने स्वतःच्या स्वार्थासाठी कर्णाचा पुरेपूर उपयोग करून घेतला.
आजच्या या काळात स्वार्थी मैत्री वाढलेली आहे.स्वतःच्या फायद्या साठी मैत्री करून घेणारे मित्र जास्त प्रमाणात आढळतात. आपलं काम संपले की,त्यांना दूर लोटतात.मित्रांनी मित्राच्या पार्टीमध्ये स्वार्थासाठी फसवणारे मित्र आहेत.कै.मा.गोपीनाथजी मुंडे साहेब व कै.मा.विलासरावजी देशमुख साहेब यांच्या मैत्रीमध्ये कसलाही स्वार्थ नव्हता. लपवा छपवीचा डाव त्यांनी कधी खेळला नाही. त्यांच्या मैत्रीमध्ये सारथ्य होतं. एकमेकाबद्दल सहानुभूती, आपुलकी,दया होती.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी शाहू महाराज एकमेकांचे आदरयुक्त मित्र होते.
नेहमी ते एकमेकांचा वैचारिक विचारातून आदर करत असायचे. राजर्षी शाहू महाराज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही विद्वतेचे राजे म्हणून त्यांचा यथोचित सन्मान करायचे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध
कविवर्य प्रा.इंद्रजीत भालेराव आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांच्या मैत्रीचे किस्से आपण नेहमी ऐकत आलो आहोत.सध्या निखळ मैत्री राहिली नाही. त्यामध्ये भेसळ झाली आहे. दगा फटका होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.सध्याच्या युगातील बरेच लोक लबाड,लफंगे, खोटे बोलणारे, विश्वासघातकी,चुगल्या करणारे झाले आहेत. थोड्या फायद्यासाठी काहीही करायला तयार आहेत.
अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून तुमचे मित्र स्वार्थी नको. तुमचे सारथ्य करणारे असावेत. तरच समाजामध्ये संस्कृती टिकून राहते.
विश्वास राहतो.सध्याच्या काळातील लोक आपण एखाद्याचे काम केले की लगेच आपले काम त्यांनी करावे अशी अपेक्षा निर्माण झाली आहे. थोडा उपकार झाला की त्या माणसाला काय मागून घेता येईल? याचा हिशोब नवीन पिढी करीत आहे. जीवनात चांगले कर्म करा. त्याकर्माचे फळ तुम्हाला चांगलेच मिळते. आपल्या वाटेला जे काम आलेले आहे. ते काम तुम्ही करा. तरुण हीच देशाची खरी संपत्ती आहे. आजच्या काळात तरुण पिढी भरकटत गुन्हेगारीकडे जाताना दिसत आहे. दहशतवाद, वसाहतवाद, प्रदेश वाद, यामुळे विरोधक वाढत आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या शेजारी राष्ट्राची आपले संबंध सलोख्याचे असावेत, मित्रत्व टिकवावे, मैत्रीमुळे अनेक गोष्टी शक्य होतात, चित्तोडची महाराणी कर्णवतीने बादशाहा हुमायूनला राखी बांधली. त्यामुळे ती आपलं राज्य व पती वाचवू शकली. आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवावी .आजचे युग हे विज्ञानाचे आहे. अभ्यासात मेहनत घ्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यां मध्ये कष्ट करण्याची क्षमता असते.त्या क्षमता विद्यार्थ्यांनी आत्मचिंतन करून आत्मविश्वासाने वाटचाल केली पाहिजे. त्यामुळे समाजातील सेवानिवृत्त व्यक्तींनी कर्तृत्वान नेतृत्वाला जपायला शिकावं. खोटेपणा जास्त दिवस टिकत नाही एक दिवस तो बाहेर येतो. त्यामुळेच स्वार्थी नको, सारथ्य करणारे महारथी व्हावे. मानवी जीवनामध्ये एकमेकांना सांभाळून घ्यावे.तिरस्कार न करता पुरस्कार कसा देता येईल.याकडे लक्ष वेधावे. दुसऱ्याचे भले करण्यात आपला मोठेपणा आहे. म्हणून स्वार्थ बाजूला करावा.आणि सारथ्य बनवून दोघांचे जीवन यशस्वी करून घ्यावे.तेव्हाच मित्रत्व टिकते.प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत
अध्यक्ष: विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडी. ता .मुखेड जि.नांदेड

