filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 3145728;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 41;
कंधार : ( दिगांबर वाघमारे )
राज्य शासनाच्या शिक्षण विभागामार्फत इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व शिक्षकांसाठी मूल्यवर्धक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीत गुणवत्ता वाढविणे आणि विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये, सर्जनशीलता व आत्मविश्वास विकसित करणे हा असून कंधार येथील बाळंतवाडी ‘एसआरटी’
अध्यापक विद्यालयात चार टप्यात प्रशिक्षणाचे नियोजन केले असून पहिला टप्पा पूर्ण झाला आहे व आज दि १४ नोव्हेंबर पासुन दुसरा टप्पा सुरू झाला असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी संजय येरमे यांनी दिली .या प्रशिक्षणात नवीन शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर, बालकेंद्रित शिक्षण, संवादकौशल्य, तसेच आनंददायी शिकवणीचे महत्त्व यांवर विशेष देण्यात आला आहे . मास्टर ट्रेनर नागेश बोडखे, जिल्हा समन्वयक बाळासाहेब कांबळे, तालुका समन्वयक संतोष गायकवाड हे प्रशिक्षण देत आहेत.
नवीन कौशल्ये आणि ज्ञान मिळवल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. त्याकरिता सर्व शिक्षकांनी परिश्रम घ्यावेत तसेच विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये रुजवण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी संजय येरमे यांनी केले.पहिला टप्पा दि ११ ते १३ नोव्हेबर असा होता त्यामध्ये २५२ शिक्षकांनी प्रशिक्षण घेतले आहे . या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी १२ सुलभक तसेच शिक्षण विस्तार अधिकारी वसंत मेटकर सह, केंद्रप्रमुख आदी परिश्रम घेत आहेत .
____________________
चार टप्यात शिक्षकांचे प्रशिक्षण असून दररोज चहापाणी , दुपारी जेवण असे जाग्यावर नियोजन केले असून दि.११ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीत कंधार तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा तसेच खाजगी शाळेतील सुमारे एक हजार ३२ शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे
– शिक्षणविस्तार अधिकारी वसंत मेटकर
##

