दुपारची वेळ होती अचानक मला माझ्या मोठ्या भावाचा फोन आला आणि म्हणाला काय करायलास मी म्हणलं काय नाही नांदेडलाच आहे पण तो म्हणाला तू लगेच जालन्याला जा नागेश महाराजांची तब्येत बिघडली आहे. मी घाबरलो अचानक काय झाले. काही समजायला तयार नाही पण मी कार काढली आणि माझ्या पत्नीला घेऊन जालन्याकडे निघालो. पाहतो तर काय त्यांना जालना हॉस्पिटल येथे दोन दिवस उपचार करून मी त्यांना नांदेड येथील डॉक्टर निशिकांत एकलारे व सौ विद्या एकलारे मॅडम यांच्या सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
माझी पूर्वीची ओळख असल्यामुळे माझा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता. पण मी जसा विचार करत होतो चार दिवस उपचार करून त्याला लगेच कंधारला घेऊन जावे पण झाले सगळे उलटेच आणि पाहता पाहता माझ्या भावाची तब्येत अखेरच्या स्टेपला गेली. आम्ही सगळे घाबरलो घाबरल्या नंतर डॉक्टर दापत्यांनी सुद्धा सांगितले की आता फक्त देवावर भरोसा ठेवा. काय उत्तर द्यायचे ते त्यांनी देऊन टाकले सगळं काही आई जगदंबेच्या हातात आमची सूत्र गेली. सतत आराधना, सतत डोळ्यात पाणी, जप- तप, गणेश याग केला, महामृत्युंजय जप केला तरीही नागेश महाराज यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती त्यानंतर ते व्हेंटिलेटर वर गेले.
तब्येतीचा कुठलाच आजार त्यांना दिसत नव्हता पण साधी गोष्ट पण त्यांच्या जीवावर आली काय झाले आणि काय नाही ते कोणालाच कळायला तयार नाही. डॉक्टर म्हणतात यांना कुठलाच आजार नाही पण तब्बल 32 दिवस दवाखान्यामध्ये काढले. ते म्हणतात हे इतके दिवस जगलेच कसे कारण बिना अण्णा पाण्याचे जगणे हे साधारण माणसाचे काम नाही. पण काय दैवी शक्ती आहे हे कोणालाच कळायला तयार नाही पण हळूहळू डॉक्टर निशिकांत एकलारे व डॉक्टर विद्या एकलारे यांच्या अथक परिश्रम व त्यांनी घेतलेले कष्ट हे शब्दात आम्ही व्यक्त करू शकत नाहीत.
त्यांनी आमच्या 32 दिवसाच्या काळात सख्या भावासारखे आमच्या भावाची व आमच्या कुटुंबाची काळजी घेतली हे विशेष! विशेष म्हणजे स्वच्छ दवाखाना, योग्य उपचार पद्धती, सुंदर स्टॉप, मनमिळावू डॉक्टर दांपत्य, स्वच्छता, आणि डॉक्टरांची उत्कृष्ट भावनात्मक रुग्णासोबत संबंध यामुळेच आज आमचे भाऊ आमच्या हाताला लागले. अखेर आई जगदंबा आम्हाला पावली अन् नागेश महाराज हसले……
ओंकार लव्हेकर
दैनिक चालु वार्ता
मराठवाडा उपसंपादक,नांदेड

