२६ मे च्या उपोषणा ने नक्कीच प्रश्न सुटेल:- डॉ राजन माकणीकर अनेक्स हॉटेल व आकृती सेंटर पॉईंट वर चढेल बुलडोजर(?)

मुंबई दि (प्रतिनिधी) २६ मे रोजी राजभवन वर होणाऱ्या आमरण उपोषणाने नक्कीच प्रश्न मार्गी लागुन चोर विकासक विमल शहा व महादलाल मुरजी पटेल जेरबंद होनार असा आशावाद पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय महासचीव, आंबेडकरी, सामाजिक व आरटीआय ऍक्टिव्हिस्ट डॉ. राजन माकणीकर यांनी नुकताच आशावाद प्रकट केला. ते म्हणाले की अनेक्स हॉटेल आणि आकृती सेंटर पॉईंट वर 100 टक्के बुलडोजर चढणार.

पुढे म्हणाले की, राजभवन येथे करत असलेल्या आंदोलनातून मूळ झोपडी धारकांना सदनिका तर मिळतीलच पण एमआयडीसी भ्रष्ट अधिकारी, महादलाल मुरजी पटेल आणि चोर विकासक विमल शहा यांचेवर चौकशी समिती नेमण्यात येईल.

चौकशी दरम्यान कुन्याही अधिकाऱ्यांची बदली होऊ नये आणि झालीच तर अश्या त्या अधिकाऱ्याला चौकशी पर्यंत कोणतेच अधिकार प्रदान करण्यात येऊ नये शिवाय बदली ठिकाणी न पाठवता उद्योग सारथी कार्यालयात कोणतेही अधिकार ना देता बसवावे अशी मागणी करण्यात आली आहे.

आकृती हब टाऊन चे प्रामाणिक अधिकारी मुरजी पटेल ने काढून टाकले व सूत्र स्वतः हाती घेतले, विकासक विमल शहा महादलाल मुरजी पटेल मुळे हतबल झाला असला तरी करता करविता मुरजी पटेलच आहे, विमल शहा सोबत तत्कालीन एमआयडीसी अधिकारी सुद्धा जेरबंद होणार असल्याचे ठाम मत डॉ. माकणीकर यांनी आमच्या प्रतिनिधिकडे बोलतांना व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *