केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार येऊन सात वर्ष पूर्ण झाले त्या प्रित्यर्थ मदर डेरी बारूळ येथे गरजू नागरिक संसार उपयोगी साहित्याचे वाटप

कंधार ; प्रतिनिधी

केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार येऊन सात वर्ष पूर्ण झाले त्या प्रित्यर्थ आज दि.३० मे रोजी मदर डेरी बारूळ येथे गरजू नागरिक संसार उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी बालाजी दशरथा जाधव ,श्रीमती अंजनाबाई विठ्ठल चिंचोले यांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप करताना भाजपा तालुका उपाध्यक्ष तथा वार्ताहर एस पी जाधव जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव नाईक, दत्ता पाटील पवळे तर उस्माननगर येथील सामाजिक कार्यकर्ते, तथा महाराष्ट्र राज्य सरपंच संघटनेचे राज्य संघटक शिवशंकर काळे यांचा बारूळ येथे आज दिनांक 30 रोजी दैनिक पुढारी चे तालुका प्रतिनिधी संघपाल वाघमारे यांचे हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा कार्यकर्ते माधव शिंदे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव नाईक ,भाजपा तालुका उपाध्यक्ष एस पी जाधव ,ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी शेषराव डिकळे गुरुजी आदीची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *