कंधार ; प्रतिनिधी
परभणी मधील सेलु येथे दिपकभाई केदार व भिमराव गोटे यांच्यावर दिनांक ३० जुलै २०२१ रोजी संध्याकाळी कट रचुन जिवघेणा हल्ला झाला आहे. तरी येथे याची तात्काळ दखल घेवुन तसेच महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये सामाजिक प्रश्नांना न्याय देण्याची भुमीका घेणाऱ्या आंबेडकरी नेत्यांवर सध्या महाराष्ट्रामध्ये जीवघेणे हल्याचा प्रकार वाढताना दिसुन येत आहे.
आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होताना दिसुन येत आहे.
तरी याची तात्काळ दखल घेवुन भ्याड हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करावे.
अन्यथा ऑल इंडिया पँथर सेनेच्या माध्यमातुन लोकशाही मार्गाने तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. या निवेदनावर ऑल इंडिया पँथर सेने कंधार तालुका संघटक सुनिलदादा सोनकांबळे, विलास सोनकांबळे,गोविंद सोनकांबळे,आकाश सोनकांबळे,अजय सोनकांळे आदीची यावेळी उपस्थिती होती.


