बि.एस.एफ जवानाची शेतकरी कुंटूंबास जिवे मारण्याची धम्मकी … नायगाव पोलीसांत गुन्हा दाखल

नायगाव ; प्रतिनिधी

नायगांव तालुक्यातील कुंटुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रूई बु.येथील शेतकरी कुंटुबास बि.एस .एफ जवान भास्कर गोरटकर यांनी जीव मारण्याचे धम्मकी दिल्या प्रकरणी पोलीस अधिक्षकाकडे केली लेखी तक्रार करण्यात आली त्यावरुन नायगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नायगाव तालुख्यातील रूई( बु) येथील पांडे व गोरटकर कुंटूंबात वाद होऊन परस्पर तक्रारी होऊन चार जणाविरोध कुंटुर पोलीसा ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जवाबात नाव असताना भास्कर गोरटकर याना या गुन्हयातुन वगळण्यात आल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की .रूई बु येथील पांडे आणि गोरटकर हे दोघांचे घर जवळ जवळच आहेत . लघुशंकेवरून दोघांच्या मध्ये भांडण झाली यात परस्पर तक्रार दाखल झाली .

हाणमंत पांडे याच्या तक्रारी वरूण गोरटकर याच्या गटाच्या चार जनांवर गुन्हा दाखल झाला तर यातुन भास्कर गोरटकर याचे नाव वगळयाने आश्चर्य व्यक्त केले जात आहे .
तर मंजुळा गंगाधर गोरटकर याच्या फिर्याद वरून पांडे गटाच्या चौंघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

गावात नेहमीच भास्कर गोरटकर वाद घालतो माझे संबध वरपर्यत आहेत माझ काहीच होत नाही असे निवेदनात म्हटले आहे .पांडे कुंटूंबास जिवे मारण्याची धम्मकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावे आशी मागणी सुर्यकांत शंकरराव पांडे यानी लेखी निवेदनाद्वारे पोलीस अधिक्षक याना देऊन केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *