कायदा व सुवस्था अबाधित ठेवायची असेल तर अण्णाभाऊ साठे यांचा हटवलेला पुतळा पुन्हा बसवा व समाज बांधवावरील गुन्हे मागे घ्या – सचिनभाऊ साठे

कंधार ; प्रतिनिधी

कंधार तालुक्यातील गऊळ येथील लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या नियोजित जागेतील बसविलेला पुतळा हटवून पोलिसांनी मातंग समाजावर अमानुष लाठीचार्ज २० ते २५ जणांवर दाखल केलेले खोटे गुन्हे माघारी घेऊन काढलेला पुतळा १७ सप्टेंबरपूर्वी सन्मानाने बसविण्यात यावा, अन्यथा कायदा व सुवस्था बिघडल्यास प्रशासन जबाबदार धरून सबंध महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही असा इशार लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचे नातु सचिन साठे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

कंधार येथील अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहात ४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परीषदेला
सचिन साठे,विष्णुभाऊ कसबे, रामचंद्र भांडे,मारोती वाडेकर,कैलास खंदारे,सचिन क्षिरसागर,दिलीप अर्जुने,रावसाहेब पवार,नागोराव कुठे,प्रितम गवारे,माधव डोम्पले,नागोराव आंबटवार,प्रदिप वाघमारे,सिताराम पवार,मनिष कावळे,मारोती गायकवाड,मुकिंदर कुडके,कैलास भालेराव,भंडारे,काचमोडे, भागवत डोंगरे, मालोजी वाघमारे,शिवाजी नुरूंदे यांच्यासह
विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

३१ ऑगस्ट रोजी कंधार तालुक्यातील मौजे गऊळ येथे लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या औचित्यावर ग्रामपंचायतच्या अभिलेखातील नमुना नंबर ८ अ वरील नियोजित जागेवर ग्रामस्थांच्या वतिने पुतळ्याच्या सरंक्षणाची हमी देऊन उपविभागीय पोलिस अधिकारी,उपविभागीय अधिकारी, तहसिलदार,गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक यांच्या समक्ष पुतळ्याच्या जागेचा असलेला वाद मिटवून ग्रामस्थांनी पुतळा बसविला.याबाबतचे शपथपत्र दोन्ही समाजाच्या स्वाक्षरीनिशी नियोजित जागेतील २० फुट जागा सोडून पुतळा बसविण्यात आला होता. त्यावेळी सर्व वाद संपुष्टात आल्याचे साठे म्हणाले.

 परंतु २ सप्टेंबर रोजी नांदेड येथून पोलिस प्रशासन गऊळ येथे येऊन मोठा फौजाफाट्यासह हजर झाले. सदरील पुतळा हटविण्याचा प्रयत्न करत असतांना,ग्रामस्थांकडून विनंती करण्यात आली. परंतु दगडफेकीच्या नावाखाली समस्त मातंग समाजावर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. या घटनेत २० ते २५ मातंग समाजातील महिला व पुरूष जखमी झाले. ग्रामसेवकाला हाती धरून शासकीय कामात अडथळा प्रकरणी सुमारे ३८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या पत्रकार परिषदेत विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी एकमुखाने ठराव घेऊन १७ सप्टेंबरपुर्वी मागण्यांना न्याय नाही मिळाल्यास मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी नांदेड येथील अण्णाभाऊसाठे पुतळ्यापासुन लाखोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकून जाब विचारणार असल्याचा इशारा पत्रकार परिषदेच्या माध्यमातुन देण्यात आला.

अशी आहे मागणी


सदरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, काढलेला पुतळा सन्मानपुर्वक प्रशासनाकडून बसविण्यात यावा, नियमबाह्य झालेला लाठीमाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, याप्रकरणाचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांवर लाठीमार केला. पत्रकार संरक्षण कायद्यानुसार संबधितांवर कारवाई करावी. गऊळ येथील निंदणीय घटनेस कारणीभुत असलेला समाज कंटक बाबु गिरे व त्यांचे साथीदार यांच्या विरोधात उनसुचिती जाती-जमाती सरंक्षण कायद्याअंतर्गत व मोक्का खाली गुन्हा नोंदविण्यासाठी विशेष चौकशी करण्यात यावी.


मौजे गऊळ येथे प्रशासनाच्या वतीने लाठीमार करण्यात आल्यानंतर नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री,खासदार, आमदार यासह कोणत्याही लोकप्रतिनिधीने भेट देऊन साधी चौकशीही केली नसल्याचे निदर्शनास आल्याने या प्रकरणात राजकीय वरदहस्त असल्याचे साठे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *