अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसगट नुकसान भरपाई देण्याची जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस संजय भोसीकर यांची मागणी

कंधार ; प्रतिनिधी

कंधार तालुक्यात झालेल्या ढगफुटी मुळे बहदरपुरा येथील शेतातील पिकांचे, गावातील घरांची पडझड, तसेच विजेचे खांब, पूल इत्यादीचे नुकसान झालेले असून त्यांची आज रोजी पाहणी केली.तसेच सरसगट नुकसान भरपाई देण्याची
जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस संजय भोसीकर यांनी मागणी केली.

यावेळी ठिकठिकाणी च्या शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस संजय भोसीकर, कृष्णाभाऊ भोसीकर यांनी पाहणी केली.

यावेळी सरपंच सौ.गोदावरीबाई गायकवाड,उपसरपंच हणमंतराव पाटील पेटकर, ग्रामपंचायत सदस्य बालाजी तोटावाड, विजय गायकवाड, देवराव कदम आदीसह गावातील नागरिक यावेळी झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *