अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा!

धर्माबाद ; प्रतिनिधी


नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शनिवारी धर्माबाद तालुक्याचा दौरा करून शेतकऱ्याच्या अगदी सहानुभूतीने व्यथा जाणून घेतल्या.


या महिनाभरात दोन वेळेस मुसळधार पाऊस झाला. जायकवाडी, विष्णुपुरी, बळेगाव, आमदुरा आदी सर्व धरणांचे पाणी दारे उघडून गोदावरी नदीत सोडण्यात आले. त्यामुळे गोदावरी नदीला महापूर आला होता. तद्वतच पोचमपाड या तेलंगणातील मोठ्या धरणाच्या बॅक वॉटर मुळे गोदाकाठची जवळपास सर्व शेती पाण्याखाली गेली होती. व सर्व खरीप पिके मातीमोल झाली. अनेक रस्ते उखडले. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी शनिवारी धर्माबाद तालुक्यातील जारिकोट, दिग्रस, चोंडी आदी जास्त क्षतिग्रस्त गावांना भेटी दिल्या. प्रत्येक गावातील गावकऱ्यांनी झालेल्या नुकसान भरपाईच्या संदर्भात पालकमंत्र्यांना निवेदन दिले.


पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या समवेत माजी आमदार वसंतराव चव्हाण, उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी ,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दत्ताहरी पाटील चोळाखेकर, शहराध्यक्ष ताहेर पठाण, जिल्हा सरचिटणीस वर्णी नागभूषण नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, धर्माबाद नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दिगंबर लखमावाड, नगरसेवक निलेश पाटील बाळापूरकर, प्रा.रवींद्र मुपडे., सुर्यकांत पाटील जुन्नीकर, मन्नेरवारलू समाजाचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव कोंडलवाडे,मारोती माकणे , गोविंद रामोड यांच्यासह काँग्रेस पक्षाचे व विविध पक्ष संघटनेचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रसार माध्यमाचे बहुतांशी प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *