बहाद्दरपुरा येथिल मन्याड नदीवरील पुलाचे तात्काळ दुरुस्ती करण्याची माजी सैनिकांची मागणी

कंधार ;

कंधार तालुक्यातील बहाद्दरपुर येथिल मन्याड नदीवरील पुलावरून ये जा करणारे वाहणास खड्यामुळे अडथळा होत असुन खड्यामुळे व पुलाच्या तुटलेल्या तटामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.

तात्काळ तुटलेल्या कडा व पडलेले खड्या ची दुरुस्ती करण्याची मागणी गुरुवार दि. 21 ऑक्टोंबर रोजी माजी सैनिकांच्या वतीने आमदार श्यामसुंदर शिदे यांच्याकडे व संबधित अधिकार्या कडे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी केली आहे.

दि २१ ऑक्टोबर रोजी याच पुलावरून शेतकऱ्यांची बैल गाडी जात असताना बैलगाडीचे चाक धाव उखळन तुटले आहे असे विविध घटणा या पुलावर होत असल्याची तक्रार यावेळी बालाजी चुकलवाड यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *