ग्राम पंचायत फलकावर सैन्यदलातील जवानांची नावे लावावी – माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांची कंधार येथिल बिडीओ ना मागणी

कंधार

ग्राम पंचायत फलकावर सैन्यदलातील जवानांची नावे लावावी – माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी कंधार येथिल बिडीओ यांना आज दि१९ जानेवारी रोजी मागणी केली आहे

देशाच्या सिमेवर अहोरात्र जागता पाहारा देत भारतीय नागरिकांचे जिवन सुरळीत ठेवतात भारतीय जवान आपल्या परिवाराचा त्याग करून भारत मातेचे सिमेवर रक्षण करत असतात.

भारतीय जवान हे राज्याचे देशाचे गावाचे सैनिक आहेत. ते आपल्या गावातील तरुण तरुणीसाठी आदर्श आहेत. अशा जवानांचा सार्थ अभिमान असतो भारतीय जवानांचा गावच्या वतीने बहुमान म्हणून ग्राम पंचायत कार्यालयात फलकावर त्यांची नावे लिहीली जावीत जेणे करून गावा गावामध्ये भारतीय सिमेवर रक्षणासाठी जाण्यासाठी तयार होतील.

सदरील कार्यवाही दि. २६ जानेवारी २०२२ चे औचित्य साधून सुरुवात करावी. अशी विनंती निवेदना द्वारे करण्यात आले अशी माहीती जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *