निम्न मानार प्रकल्प बारुळ धरणातुन नदी पात्रात करण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्ग सुरू

कंधार

निम्न मानार प्रकल्प बारुळ धरणाची आज दिनांक १३/०७/२०२२ रोजी सायं. ४.०० वाजताची पाणी पातळी ३९२.५० मी. इतकी असून धरण साठा ७४% आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे तसेच उर्ध्व मानार प्रकल्पातूनही विसर्ग नदीपात्रात सोडण्याचा इशारा दिला आहे.

त्यामुळे धरणात पाण्याचा येवा वाढणार आहे. परिणामी या धरणाचे स्वयंचलीत दरवाजे आपोआप उघडून नदी पात्रात कोणत्याही क्षणी विसर्ग वाढून पूर येवू शकतो व नदीकाठच्या दोन्ही तिरावरील क्षेत्रांना धोका संभवू शकतो.

तेव्हा आपल्या गावातील मानार नदीच्या काठावर घर, शेतीअसणाऱ्या नागरीकांना सतर्क राहून सामान, शेती अवजारे, जनावरे इत्यादी सुरक्षित स्थळी हलविण्याबाबत, तसेच नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये असे उपविभागीयअधिकारी
मानार प्रकल्प पाटबंधारे उपविभाग
बारूळ यांनी आवाहन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *