राज्यातील वाढीव वीज दर कमी करण्याबाबद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘आप’ चे निवेदन

कंधार ; प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यातील वाढीव वीज दर कमी करण्याबाबद कंधार तहसिलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम आदमी पार्टी शाखा कंधार च्या वनीने निवेदन देण्यात आले व शिवसेनेच्या वचननाम्या चे स्मरण करून देण्यात आले.

या निवेदनात असे नमूद केले आहे की महावितरण कडून लॉकडाऊन काळात दि.१ एप्रिल २०२० पासून २०% वीज दर वाढ करण्यात होती. त्यामुळे संपूर्ण देशात महागडी वीज राज्यात आहे. तरीही आता आपले सरकार आल्याबरोबार आपणही २०% पर्यंत या महिण्यापासून भाव वाढ केली आहे.

शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकी पूर्वी राज्यातील जनतेला वचन दिले होते की आमचे सरकार आल्यास आम्ही ३०० युनिट घरगुती वापरात ३०% स्वस्त वीज देवू. तसेच बीजेपी कडून विविध राज्यातील निवडणूक जाहीरनाम्यात १०० ते २०० युनिट वीज मोफत देण्याचे जाहीर केले आहे. एवढेच नव्हेतर महाआघाडी सरकार असतांना मागच्या दोन वर्षात बीजेपी व स्वता मा. देवेंद्र फडणवीस यांनी वीज दर वाढ कमी करने व मोफत वीज देण्याबाबत अनेक वेळा रस्त्यावर येवून आंदोलन केलेत.

दिल्ली मध्ये श्री अरविंद केजरीवाल सरकार मागच्या आठ वर्षांपासून २०० युनिट वीज मोफत आणि जास्ती वापर करणाऱ्यांनाही कमीत कमी दरात वीजपुरवठा करीत आहे, तरीही दिल्ली सरकार चे वीज खाते नफ्यात आहे. तसेच नव्याने सरकार मध्ये आलेले पंजाब मधील श्री भगवंत मान सरकार ने सुद्धा दि. १ जुलै पासून ३०० युनिट मोफत वीज केली आहे.

आपल्या राज्यात २.५० ते ३.०० रुपयात प्रती युनिट तयार होणारी वीज १२ ते १८ रुपये प्रति युनिट प्रमाणे दर लावून जनतेची लुट होत आहे. ही सावकारी लुट थांबविण्यासाठी आम आदमी पार्टी हा मुद्दा घेवून राज्यात गेल्या दोन वर्षापासून सातत्याने आंदोलन करीत आहे.

आता आपले सरकार आले आहे, आणि आपण राज्यातील जनतेला न्याय देण्याबाबत विश्वास देत आहात, तसेच महाआघाडी सरकार असतांना श्री देवेंद्र फडणवीस ह्याच मागण्या करीत होते, आता तेही आपल्या सोबत सरकार मध्ये आहेत त्यामुळे या गंभीर मुद्द्याकडे स्वतः लक्ष देवून खालील मागण्या तातडीने मंजूर करव्यात, ही विनंती आज आम्ही आन्दोलनाच्या माध्यमातून करीत आहोत.

. राज्यात दि १ जुलै २०२२ पासून विजेच्या दरात जी १० ते २० % अधिभार लावून वाढ केली ती त्वरित मागे घ्यावी.

२. आपण खरे शिवसैनिक असल्यामुळे ३०% स्वस्त वीज देण्याच्या वचननाम्याची पूर्तता करण्यात यावी.

३. वीज कंपन्यांचे CAG ऑडीट करण्यात यावे,

४. राज्यातील जनतेला दिल्ली व पंजाब सरकार प्रमाणे कमीत कमी २०० युनिट वीज मोफत द्यावी.

या निवेदनावर
साईनाथ मळगे तालुका अध्यक्ष आम आदमी पार्टी,कंधार
तिरुपती इंगळे तालुका उपाध्यक्ष, नितीन भोसीकर, तालुका सचिव, विठ्ठल देवकांबळे, रेणुकादास भिसे, प्रकाश नवघरे, मोनित गायकवाड, सोमेश इंगळे, अविनाश जोंधळे आदीच्या स्वाक्षरी निवेदनावर आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *