श्रध्दा वालकर च्या हत्या-यास फासावर लटकवा ..! लव्ह जिहाद व धर्मातर बंदी कायदा अमलात आणा -विश्व हिंदू परिषद व सर्वपक्षीय पदाधिका-यांची मागणी

कंधार ; ता. प्रा .

श्रध्दा वालकर हया हिंदू तरूणीचे निर्घुन हत्या करून ३५ तुकडे करणा-यास फासावर लटकवावे , राज्यात लव्ह जिहाद व धर्मातर बंदी कायदा अमलात आणावा. कंधार शहरात राक्षसी जाळे पसरविणार्या धर्मांध लव्ह जिहादी व रोडरोमियोचा तात्काळ बंदोबस्त करा अशी मागणी विश्व हिंदू परिषद व सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी निवेदनाद्वारे केली .

 

 

 

तहसिलदार कंधार यांना दि २१ नोव्हेबर रोजी देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की मुंबई येथील श्रध्दा वालकर हया हिंदू तरूणीची लव्ह जिहाद च्या जाळयात अडकवून निर्घुन हत्या करून तिच्या शरीराचे ३५ तुकडे करणारा नराधम अफताब पुणावाला हया धर्मांधांस भरचौकात फासावर लटकवावे जणे करून असे कृत्य करण्याची हिंमत कोणाची होणार नाही.

 

 

 

 

देशभरात हिंदू तरूर्णीचे अमिष दाखवून किंवा प्रेम प्रकरणात अडकवून त्यांना लव्ह जिहादच्या जाळयात अडवकले जाते अशा पिडीत हिंदू तरूणींना धर्मांतर करण्यास भाग पाडले जाते. अशा धर्मांतराचा विरोध करणा-या हिंदू तरूणींची हत्या केली जाते किंवा वाम मार्गास लावले जाते. त्या करीता लव्ह जिहाद व धर्मांतर विरोधी कायदा तात्काळ अमलात आणावा, तसेच कंधार तालुक्यात लव्ह जिहादचे अनेक प्रकरणे समोर आले आहेत त्यातील कंधार शहरातील हिंदू तरूणीचे दि.१२ नोव्हेंबर रोजी लव्ह जिहादीनी अपहरण केले होते. या प्रकरणी हिंदूत्ववादी तरुणांनी पोलीस प्रशासनाच्या मदतीने त्या तरूणीस सुखरूप परत आणले . असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी अशा प्रकरणाच्या मुळाशी कोण आहे व या लव्ह जिहादींना अर्थिक रसत पुरवणारे शोधून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी,त्या बरोबर कंधार तालुक्यातील शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, बसस्थानक परिसरात रोडरोमीयोनी उच्छाद मांडला आहे.

शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस परिसरात शिक्षणासाठी शहरातील व ग्रामीण भागातील शिक्षणासाठी येणा-या अशा विद्यार्थीनीची छेड काडल्या जात आहे. आशांचा बंदोबस्त करावा,व कंधार शहरातील मुख्य रस्त्याने रोड रोमीयो, टुकार मुले आपली वहाने, मोटार सायकल सुसाट वेगाने पळवतात, हॉर्न मारतात, पोलीस सायरण वाजवतात, बुलेट गाडीचे सायलंन्सर काडुन फटाके वाजवणे, ट्रिपल सिट बसवून फिरणे, विनाकागदपत्रे असलेली चोरीची वाहने चालवणे असे प्रकार सरास पणे चालु असल्याने बाजार पेठेत जाणा-या महिला व शाळकरी विद्यार्थ्यांना त्रास होत असून. भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

असे प्रकरणे थांबवयाच्या दृष्टीने तालुक्यातील महिला, मुली, विद्यार्थीनी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दामिनी पथक किंवा चिडीमार पथक स्थापन करून रोडरोमियो चा बंदोबस्त करावा अशी मागणी विश्व हिंदू परिषद व कंधार वासीयांच्या वतीने निवेदनाद्वारे केली असून मागणीचा गांर्भिर्यपुर्वक विचार करून लव्ह जिहादी व रोडरोमियोचा तात्काळ बंदोबस्त करावा जणे करून महिलांमध्ये सुरक्षितेची भावना निर्माण होईल व शहराती शांतता व कायदा सुव्यवस्था आबादीत राहील. असेच प्रकार चालु राहिल्यास हिंदूत्ववादी संघटनेच्या वतीने समाजविघातक तरुणांचा बंदोबस्त केला जाईल असा इशारा प्रशासनास देण्यात आला आहे .

या वेळी विश्व हिंदू परिषदेचे तालुका सहमंत्री पंडित ढगे ,भाजपा तालुका अध्यक्ष भगवान राठोड, भाजपा महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा सौ जयमंगल औरादकर , सरपंच संघटनेचे अध्यक्ष मारुती पंढरे,भाजप शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राजकुमार केकाटे ,राष्ट्रीय युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अजय मोरे ,शेकाप शहराध्यक्ष महेश पिनाटे ,अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनोज गांजरे ,तालुका अध्यक्ष रमेश देशपांडे, शिवसेना शहर प्रमुख अतुल पापीनवार, अड रवी केंद्रे,अभावीप तालुका मंत्री किशन कळणे, लहुजी शक्ती सेनेचे बाबुराव टोम्पे, भाजपा सोशलमीडिया चे अड सागर डोंगरजकर ,नरेंद्र मोदी विचार मंच चे तालुका समन्वयक शरद मुंडे, युवा सेनेचे निरंजन वाघमारे, बबन शेंडगे ,गणेश उगले ,प्रदीप व्यास ,कोंडीबा बनसोडे, दीपक गोरे, राजू मठपती ,प्रवीण बनसोडे, विनोद कांबळे, अड शिवराज बनसोडे ,शिवशंकर सावरकर ,योगेंद्रसिंह ठाकूर ,बालाजी कल्याणकर , स्वप्निल जोशी, रवी संगेवार ,विशाल बासटवार ,शुभम संगणवार,यांच्यासह कंधार शहरातील नागरिक उपस्थित होते…

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *