धम्म चळवळीत स्रियांचे मोठे योगदान -प्रशांत गवळे

नांदेड –

बुद्धकालखंडापासून धम्मचळवळीत स्रियांचा सक्रीय सहभाग राहिलेला आहे. आंबेडकरी चळवळीतही त्या प्रत्येक कृतीत अग्रेसर होत्या. शैक्षणिक, राजकीय तथा साहित्यविषयक चळवळीबरोबरच आजच्या धम्मचळवळीत स्रियांचे योगदान मोठे असल्याचे मत येथील युवा साहित्यिक प्रशांत गवळे यांनी मांडले.

ते सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने दरपौर्णिमेला घेण्यात येणाऱ्या काव्यपौर्णिमा या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सप्तरंगी साहित्य मंडळाचे गंगाधर ढवळे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष शामराव वाघमारे,

सुमेध कलामंचाचे अध्यक्ष कृष्णा गजभारे, सचिव गंगाधर वडने, कोषाध्यक्ष मधुकर हनवते, उपाध्यक्ष भगवान वाघमारे,रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा गोदावरी सरोदे, सचिव प्रतिभा हटकर, उपाध्यक्षा कमलाबाई हटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


               शहरातील डॉ. आंबेडकर नगरात  सुमेध कलामंच, ज्येष्ठ नागरिक संघ, रमाई महिला मंडळ यांच्या सहभागाने बुद्धसं बुद्ध विहार येथे काव्यपौर्णिमा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

धम्म चळवळीचे सांस्कृतिक अधिष्ठान या विषयावर प्रशांत गवळे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, आजच्या बौद्ध महिलांनी आपल्या मुलांवर योग्य संस्कार केले पाहिजेत. त्यामुळेच धम्मसंस्कृती जीवंत राहू शकेल.

बुद्ध विहारातील घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांतून चळवळीला योग्य दिशा मिळाली पाहिजे असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प, पुष्पहार अर्पण करून दीप व धूप पूजन करण्यात आले. यावेळी सुमेध कलामंच, ज्येष्ठ नागरिक संघ, रमाई महिला मंडळाकडून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.          

              बुद्ध विहारात सामुदायिक त्रीसरण पंचशील ग्रहण केल्यानंतर  संजय कदम यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. शेषेराव वाघमारे यांनी ‘कणा कणांनी ज्ञान वेचूनी’ हे गीत तर ‘डोले भिमाचा झेंडा निळा’ हे गीत भगवान वाघमारे यांनी गायले.

भाद्रपद पौर्णिमेनिमित्त कोल्हापूर येथून सहभागी झालेल्या कवयित्री सुधा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या काव्यपौर्णिमा या कार्यक्रमात अनुरत्न वाघमारे, गंगाधर ढवळे, नागोराव डोंगरे, बी.एल.खान, अनिता भोसले, रुपाली वैद्य/वागरे, आनंद चिंचोले, बाबुराव पाईकराव यांनी सहभाग नोंदवला तर हा कार्यक्रम आॅनलाईन पद्धतीने प्रसारित करण्यासाठी पांडूरंग कोकुलवार,

शंकर गच्चे, मारोती कदम, कैलास धुतराज,  प्रयत्न केले. झूमवरील आॅनलाईन काव्यपौर्णिमेचे संवादसूत्र आनंद चिंचोले यांनी हाती घेतले तर आभार अनुरत्न वाघमारे यांनी मानले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *