७१ भाविकांसोबत २१ वी अमरनाथ यात्रा धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण

नांदेड ; प्रतिनिधी

७१ भाविकांसोबत २१ वी अमरनाथ यात्रा धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करून आल्यानंतर ७५ यात्रेकरूंचा दुसरा जत्था बालटाल येथे पोंहचला असून मंगळवारी सर्वजण अमरनाथच्या दर्शनासाठी जाणार आहेत.

 

 

पहिल्या जथ्यातील यात्रेकरूंनी १३ दिवसाच्या कालावधीत अमरनाथ सोबत वैष्णोदेवी, अमृतसर, जम्मू, श्रीनगर, सोनमर्ग,गुलमर्ग, खीर भवानी माता,अटारी बॉर्डर या स्थळांना भेटी दिल्या.फक्त परतीच्या प्रवासात पावसामुळे रेल्वे रद्द झाल्याने ४५ यात्रेकरू विमानाने व २६ यात्रेकरू रेल्वेने स्वगृही सुखरूप पोंहचल्याने नांदेडमध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले.खा. प्रतापराव पाटील चिखलीकर,डॉ. अजयसिंह ठाकूर पूर्णा,मनोज शर्मा नागपूर, सरदार कुलदीपसिंघ लुधियाना,ओमप्रकाश पाम्पटवार,प्रतिभा राजेंद्र चौधरी परभणी,सतीश सुगनचंदजी शर्मा,नवनाथ सोनवणे उदगीर, हृदयनाथ सोनवणे,ज्ञानोबा जोगदंड जम्मू,नागेश शेट्टी, सरदार जागीरसिंघ अमृतसर,सुभाष बंग,निलेश बोंबले व गोपाळ नागपुरे अकोला यांनी दरवर्षीप्रमाणे सर्वांना प्रत्येकी एक जेवण दिले.

 

७१ यात्रेकरूंच्या एका वेळेसच्या नाश्त्यासाठी योगदान देणाऱ्यामध्ये स्नेहलता जैस्वाल हैद्राबाद ,प्रदीप शुक्ला भोपाळ,सरदार कुलदीपसिंघ लुधियाना,महेश जायस्वाल यवतमाळ यांचा समावेश आहे.यात्रेकरूंपैकी अशोक जायस्वाल पूर्णा, मिना कुलकर्णी,अरुण लाठकर,दिगम्बर शेंदूरवाडकर, श्याम रावके, शशिकांत कुलकर्णी,मुकेशसिंह तौर, गंगाधर फलटणकर, रेखा देशपांडे, श्रीकांत कुलकर्णी, सुधाकर ब्रह्मनाथकर,विशाल राठी, ब्रिजकिशोर दरक, विशाल मंत्री, बालाजी कवाणकर, शंकरराव देशमुख यांनी जागोजागी अन्नदानासाठी सहकार्य केले.

 

यात्रा यशस्वी करण्यासाठी दिलीप ठाकूर यांच्या समवेत अभय शृंगारपुरे, सुभाष देवकत्ते, अमोल गोले यांनी परिश्रम घेतले.यात्रेदरम्यान राहण्याची व वाहतुकीची व्यवस्था उत्तम होती.दिलीप ठाकूर यांचे योग्य नियोजन, भोजनाची सर्वत्र मोफत व्यवस्था, विविध मनोरंजक खेळ यामुळे अवघड असलेली अमरनाथ यात्रा सुलभ रीतीने पूर्ण झाल्याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले.२२ वी अमरनाथ यात्रेतील सर्व ७५ यात्रेकरूंची प्रकृती उत्तम आहे. यावेळी दिलीप ठाकूर, संदीप मैंद, मिलिंद जलतारे, विशाल मुळे, लक्ष्मीकांत जोगदंड यांच्यासह ठाणे येथील उदय यांच्या कॅटरिंग टीम मधील ७ सदस्य चोख व्यवस्था करत आहेत.हवामान उत्तम असल्यामुळे मंगळवारी सर्वांचे दर्शन होईल असा विश्वास दिलीप ठाकूर यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत बालताल येथून बोलतांना व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *