शालेय शिक्षण विभागाच्या ‘लेट्स चेंज’ उपक्रमांतर्गत ‘स्वच्छता मॉनिटर’ अभियानाचा मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

 मुंबई ; शालेय शिक्षण विभागाच्या ‘लेट्स चेंज’ उपक्रमांतर्गत ‘स्वच्छता मॉनिटर’ अभियानाचा मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. या अभियानांतर्गत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांना ‘स्वच्छता मॉनिटर्स’ बनविण्यात आले असून हे विद्यार्थी स्वच्छतेच्या बाबतीत आमूलाग्र क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

 

स्वच्छता हा आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय असून ‘लेट्स चेंज’ उपक्रमात ६४ हजार शाळांमधील ३८ लाख विद्यार्थी सहभागी होत असल्याने स्वच्छतेच्या बाबतीत आमूलाग्र बदल घडेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा स्वच्छ भारत हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. राज्यातील या उपक्रमामुळे आणि त्यात विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणावरील सहभागामुळे महाराष्ट्र स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर व्हायला वेळ लागणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

शिक्षण विभागाच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडत असल्याचे सांगून शाळा मान्यतेसाठी आता फेऱ्या माराव्या लागत नाहीत, ते प्रस्ताव आता तातडीने मंजूर होत असल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले.

यावेळी कु. राघवी पालांडे, श्रेया पवार, प्रदिप्ता घोष आदी स्वच्छता मॉनिटर्स विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, ‘लेट्स चेंज’ उपक्रमाचे संचालक रोहित आर्या यांच्यासह ‘स्वच्छता मॉनिटर’ विद्यार्थी उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *