साहित्यातून सदैव संवेदनशीलत्व जपणाऱ्या लेखिका – सौ.रुचिरा बेटकर  

 

 

निखळ सेवा शैक्षणिक क्षेत्र असो अथवा साहित्य क्षेत्र असो त्यात प्रमाणिकपणे आणि निखळ सेवा देणाऱ्या
सौ.रुचिरा बेटकर साहित्य जगतातील सर्वांना परिचित असलेले नाव तिच्या लेखणीत जसे माधुर्य‌‌ आहे अगदी तसेच हुबेहूब तिच्या वागण्यात, बोलण्यात ही माधुर्य आहे‌. एक साहित्यिक म्हणून तिची उभारी वाखाणण्याजोगी आहे.
अतिशय बोलकी मनमिळाऊ असणा-या माझ्या या गोड मैत्रिणीला १० डिसेंबर रोजी दिल्ली येथे वीरांगणा सावित्रीबाई फुले राष्ट्रीय फेलोशीप पुरस्कार मिळाला आहे.त्याबद्दल तिचे खूप खूप अभिनंदन.

‌नांदेड येथील रहिवासी रूचिरा बेटकर यांनी साहित्यातून सदैव संवेदनशील असे लेखन केलेले आहे. यांच्या लेखनाची व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांची दिल्ली येथील
भारतीय दलीत अकादमी तर्फे देण्यात येणारा सन २०२३ या वर्षीचा वीरांगणा सावित्रीबाई फुले राष्ट्रीय फेलोशीप पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
सौ.रूचिरा शेषराव बेटकर ह्या उच्चशिक्षित असुन त्या शिक्षिका आहेत.शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नेहमीच ज्ञानदानाचे पवित्र काम ते करीत असतात. याचबरोबर वेळोवेळी पालकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी उपक्रम व बाल संगोपन या विषयावर सतत पालकांना मार्गदर्शन करत असतात.
19 फेब्रुवारी 2019 रोजी शैक्षणिक कार्यासाठी त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. शैक्षणिक आणि
साहित्यिक क्षेत्रात यांचे मोलाचे योगदान आहे. विविध मासिक अंक, दैनिक अंक यात सतत संवेदनशील साहित्यिक लेखन करतात. ९५ वे आ.भा.म.साहित्य संमेलन-२०२२ उदगिर व
९६ वे आ.भा.म.साहित्य संमेलन -२०२३ वर्धा येथे काव्यवाचनासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
वीरांगणा सावित्रीबाई फुले फेलोशिप पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ. रुचिरा बेटकर यांचे सर्वच क्षेत्रातून कौतुक केले जात आहे. तसेच आज १२ डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे. यामुळे साहित्यिक,सामाजिक,व मित्र परिवारातून दुहेरी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

सौ.अंजली मनोज मुनेश्वर नांदेड
९६३७११६५५३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *