लोकवर्गणीतून अनाथांसाठी जमा झाले 56 हजार : सात वर्षांपासून संचालिका जयश्री जयस्वाल यांचा सातत्यपूर्ण उपक्रम

 

नांदेड ( प्रतिनिधी ) शहरातील श्रीनगर येथील, माँ. संतोषी मुलींचे वस्तीगृह तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त, दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी. स्थळ श्रीनगर, नांदेड येथे अनाथ-निराधार मला -मुलींच्या सहकार्यासाठी तिरंगा बॅच प्रदानकरून “निधी संकलन” संचालिका जयश्री संजयकुमार जयस्वाल यांच्याकडे करण्यात आले. गेल्या सात वर्षांपासून संचालिका जयश्री जयस्वाल यांनी सातत्यपूर्ण हा उपक्रम घेऊन एक सामाजिक बांधिलकी जपली आहे.

 

निधी संकलनातून जमा झालेला 56,214 रुपयांचा निधी हा सिंधुताई सपकाळ अनाथ आश्रम, पुणे येथे देण्यात येणार आहे. असे जयश्री जयस्वाल यांनी कळविले आहे. यावेळी, युवा साहित्यिक सोनू दरेगावकर, नांदेड, चंदा रावळकर, पूजा बिसेन, संजयकुमार जयस्वाल, विष्णू गोडबोले, गुलाब ठाकूर, राजेश सपाटे, बंडेवार, धनराज, प्रिती, अश्विनी, शिल्पा, करणं आदींनी निधी संकलनासाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमातून देशभक्तीपर गीतांनी नांदेडकरांची मने जिंकली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *