कंधार शहरात वारंवार खंडीत होणारी विद्यूत सेवा सुरळीत करा – युवासेनेची मागणी

 

कंधार; प्रतिनिधी

कंधार शहरातील मागील ब-याच दिवसा पासुन कोणत्याही वेळेत तीन ते चार तास लाईट व तसेच पाणी पडले तरी किंवा नाही पडले तरी लाईट जात येत असते. त्यामुळे नागरीकांना फार मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असुन लाईटचे जे काहि मेन्टेनन्स आहे ते मेन्टनन्स लवकरात लवकर व्यवस्थित करुन लाईट कोण्याही वेळेला जाणार नाही याची दक्षता घ्याची अशी मागणी शिवसेना पक्ष युवासेना शहर प्रमुख गुलाम अलीम गुलाम समदानी यांनी आज दि.१८ जुन रोजी कंधार अभियंता म रा वि वि कंपनी कंधार यांना केली .

पुढे या निवेदनात असे नमूद केले की जर लाईटचे मेन्टनन्स करुन लाईटची व्यवस्था सुरळीत केली नाही तर आपल्या कार्यालया समोर नाईलाजास्तव कार्यकत्यासह भविष्या मध्ये उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

या निवेदनावर गुलाम अलीम गुलाम समदानी युवासेना शहर प्रमुख कंधार,
शेख आरिश (सामाजिक कार्यकर्ते) यांच्या स्वाक्षरी आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *