भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजपरिवर्तनाचे, सामाजिक, आर्थिक समतेवर आधारित समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांनी चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात केले.
देशातील सामाजिक विषमतेला आव्हान देत समता व बंधुत्वाचे मूल्य देशात रुजवण्याचे ऐतिहासिक कार्य बाबासाहेबांनी केले. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक नागरिकाला जगण्याचा समान अधिकार, संधीची समानता व स्वप्ने साकार करण्याचा विश्वास दिला,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले
भारताच्या संविधानाच्या माध्यमातून देशाची एकता व अखंडता कायम ठेवण्याचे अमूल्य कार्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे. आज आपण जो एकसंघ भारताचा अनुभव घेत आहोत, त्याचा डॉ. आंबेडकर यांचे संविधान हेच आधारस्तंभ आहे, असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

