विटाळ झाला म्हणुन जिथे स्त्रीचा खून होतो किवा विटाळ म्हणुन मासिकपाळी गोळ्या घेउन पुढे ढकलली जाते आणि हे सासू तिच्या सुनेच्या बाबतीत वागते किवा सेम जातीतील मुलगी तिचा मुलगा पसंत करतो पण ही पोट जातेची आहे असं म्हणुन सासू सुनेला नाकारते किवा तिचा मानसिक छळ करते अशा उच्च शिक्षीत घरातही जातीचं विटाळ आणि गचाळ राजकारण खेळलं जातं तिथे बाहेरच्या लोकांना जात धर्माचे धडे शिकवणारे आपण कोण ना.. आधी आपण आपलं घर सुधारुया आणि मग समाज..
काल एका व्यक्तीचा फोन आलेला.. तुम्ही आम्हाला लैगिकतेसाठी मार्गदर्शन करायला याल का.. आमचा अमुक जातीचा गृप आहे असं म्हटल्यावर मी त्यांना स्पष्ट नकार दिला कारण मी स्वतः कुठल्याही जातीसाठी काम करत नाही कारण माझ्या कृष्णाने जात हा शब्दच कुठे वापरला नाही मग मी अमूकएका जातीच्या मीटींगला का जाऊ ??. लैगिकतेचं ज्ञान हे सगळ्यासाठी आहे आणि मला मोठं करणारा आणि माझ्यावर प्रेम करणारा वाचकवर्ग हा सगळ्या जातीधर्माचा म्हणजेच सगळ्या वर्णाचा आहे.. एकच प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारा कि सृष्टीची निर्मिती एकाने केली कि प्रत्येक धर्मासाठी सृष्टीचा निर्माता वेगळा आहे ??.. कुठल्याही ग्रंथात त्याचं उत्तर एकच असं येईल .. त्यानेच शतरूपा आणि मनुची निर्मिती केली तेव्हाही त्यांना जात धर्म नव्हता.. एक पुरुष आणि एक स्त्री हीच जात आणि हाच धर्म.. हेच याचं उत्तर आहे आणि हेच उत्तर असेल तर आपण जाती धर्मावर लढाया करणारे कोण ?? कोणी कोणाला मारलं हे त्यांचं प्राक्तन आणि ते लक्षात ठेवून एखाद्या व्यक्तीला आयुष्यातुन उठवणं यातून आपले भविष्य आपण घडवणार आहोत हे चुकीचे आणि वाईट आहे. आपण माणूस आहोत आणि समोरचाही माणूसच आहे.. आपल्यात आत्मा आहे त्याच्यातही आहे.. आपल्यात परमात्मा आहे आणि त्याच्यातही आहे .. त्याचही रक्त लाल आपलही लालच.. रक्त देताना जात धर्म पाहिला जात नाही तर गट पाहीला जातो.. अपघात झाल्यावर कोण हॉस्पिटलमधे नेतो आणि कोण तोंडात पाणी घालतो आपल्याला माहीत नाही.. गेल्यावर स्मशानांत कोण नेतं माहीत नाही कशाचाही थांगपत्ता नसताना आपल्या अशा वागण्याला खरच अर्थ आहे का ??.. जन्म झाला कि आधी जातीचे प्रमाणपत्र किती वाईट आहे ना हे.. आपणच एकमेकांची उणीदुणी काढतो आणि दुसऱ्या जाती धर्मावर ताशेरे ओढतो हे किती योग्य आहे.. त्यापेक्षा प्रत्येकाने शास्त्र आणि त्यातील रीॲलीटी जाणून घ्यायला हवी.. जात धर्म कोणी आणले यावर विचार व्हायला हवा.. आपल्या मुलांना या सगळ्याच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा असेल तर त्यांना आपले ग्रंथ , शास्त्र याबद्दल माहीती देणं त्या आधी ते आपण समजून घेणं गरजेचे आहे.. जात धर्म वाईट नाही तर चुकीच्या पध्दतीने त्यांना ज्ञान दिलं जातय यावर काम व्हायला हवं.. त्यांना भडकवलं जातय ते थांबायला हवं.. लहान वयात वाईट गोष्टी त्यांच्यावर हॅमर केल्या जातात हे थांबायला हवं म्हणजेच काय तर जात धर्माच्या नावाखाली चालणारं राजकारण आणि त्यातून बदलणारी मानसिकता हे सद्य परिस्थितीला जबाबदार आहेत.. या परिस्थितीवर आपली जाणारी एक कमेंट , किवा एखादा अपशब्द , आपल्याकडून घडणारी एखादी कृती ही फक्त आणि फक्त आपलं भविष्य घडवणार आहे.. प्रत्येक कृती किवा शब्दाचा ठसा ब्रह्मांडात उमटला जातो जो ठरवूनही परत आपल्याकडे आणता येत नाही..कुठलीही व्यक्ती समाज घडवू किवा बदलवू शकत नाही .. फक्त आपण स्वतःला बदलवायचं आहे आणि त्यासाठीच आध्यात्मिक वाचन करा..नामस्मरण करत असाल तर यापासून अलुप रहाल.. कारण या सगळ्याचा हिशोब ठेवायला तो बसलाय फक्त आपल्याला उत्तम कर्म करत राहायचे आहे… कृपया माझ्या वाचकांनी , फॉलोवर्सनी स्वतःला घडवायला वेळ व्यतीत करा.. उत्तम माणूस कसं बनता येईल यासाठी झटा ..आधी उत्तम विचार आणि मग ज्ञान , सौंदर्य आणि इतर गोष्टी येतात..
सोच बदलो ..
( मी कधीही जात , धर्म , राजकारण यावर लिहीत नाही कारण मला लेखणी भगवंताने खुप वेगळ्या कामासाठी दिली आहे त्याचा आदर करते.. )
#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

