मुखेड: (दादाराव आगलावे)
स्वतःचे गुण आपण समाजासमोर आणत नाहीत तोपर्यंत आपणास संधी मिळत नाही. संधी चालून येईल कोणीतरी येईल आणि मला संधी उपलब्ध करून देईल असं कधीही होत नाही. आयटीआय हे भारतातील सर्वात मोठे स्वयम निर्मितीचं केंद्र आहे पोस्ट ग्रॅज्युएट होऊन लोकांना नोकरी मिळत नाहीत खूप मुलं बेकार आहेत परंतु आयटीआय करून रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते आयटीआय हे कौशल्य विकसित शिक्षण आहे, स्वयंरोजगार निर्मिती शिक्षण ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन मुखेड भूषण डॉ. दिलीप पुंडे यांनी केले.
सुप्रभात मित्र मंडळ मुखेडच्या वतीने विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या गुणवंताच्या सत्कार समारंभात अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सुप्रभात चे अध्यक्ष लक्ष्मण पत्तेवार सचिव जीवन कवटीकवार, संघटक अशोक कोत्तावार, सत्कारमूर्ती शिवाजी कोनापुरे, अभियंता साक्षी कुलकर्णी, अभियंता प्रज्वल कवटीकवार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. मुखेड येथील जेष्ठ पत्रकार शिवाजी कोनापुरे यांची राज्य शासनाच्या डॉ. राजासिंह चौव्हाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुखेड येथे अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली. वसंतनगर कोटयाळ येथील सेवादास माध्यमिक विद्यालयाचे कर्मचारी तथा राठोड परिवाराचे विश्वासू सदस्य दिनेश कुलकर्णी यांची कन्या साक्षी दिनेश कुलकर्णी यांची रिलायन्स कंपनी जामनगर गुजरात येथे अभियंता म्हणून निवड करण्यात आली. मार्केट कमिटीचे माजी सदस्य प्रकाश कवटीकवार यांचे नातू प्रज्वल प्रशांत कवटीकवार यांची इन्फोसिस कंपनीत बेंगलोर येथे अभियंता म्हणून निवड झाली.
याबद्दल तिघांचा सुप्रभात मित्र मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. मुखेड भूषण डॉ. दिलीप पुंडे पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहायला शिका, स्वप्न तुम्ही पाहायची, उडायची क्षमता शिक्षक व पालक लावत असतात. जगासमोर वावरताना आजची परिस्थितीचे भान ही ठेवा. घरच्या माणसांनी थाप दिली की, ट्रिपल पोलिओचा बूस्टर डोस दिल्यासारखी उर्जा येते. मोबाईलने 50% जगाला पोटात घेतलं आहे. ए. आय. सुद्धा 50% च्या वर जग पोटात घेईल. आर्टिफिशियल च्या जमान्यांमध्ये सुंदर पिचाई हा गुगलचा सीईओ आहे, सत्या नडेला हा मायक्रोसॉफ्टचा सीईओ आहे. शिवा एचसीएल चा सीईओ आहे आणि दुसऱ्या दोन मोठ्या कंपन्याचे सीईओ सुद्धा भारतीय आहेत. सत्यम शिवम सुंदरम ही टेक्नॉलॉजी तुम्ही लक्षात ठेवावी. साक्षी कुलकर्णी व प्रज्वल कवटिकवर यांना संबोधित करताना डॉक्टर पुंडे म्हणाले की, तुम्ही कर्तव्यासाठी दुसऱ्या राज्यात जाणार आहात, माय बापाचा जीव कमी कमी होणार तुमच्याकडे माईंड असेलतर तुम्हाला निश्चित भरारी मारता येते.
इन्फोसिसची निर्मिती सुधा मूर्ती यांनी केली. सुधा मूर्ती ह्या पहिल्या इंजिनियर आणि त्या काळात महिलांना इंजिनियर म्हणून घेत नसत. त्यावेळी सुधा मूर्तीने टाटाला पत्र लिहिलं होतं मी स्त्री आहे म्हणून तुम्ही मला नाकारता का? आज त्याच सुधा मूर्ती इन्फोसिसच्या मालक आहेत. सुधा मूर्ती इज फर्स्ट लेडी इंजिनिअर इन इंडिया. टाटांना त्यावेळी नवल वाटलं ही मुलगी कोण आहे. साक्षी कुलकर्णीने सुधा मूर्तीचे अनुकरण केले पाहिजे. प्रज्वल कवटीकवार बद्दल बोलताना म्हणाले की, इथून पुढे व्यापारसुद्धा एआयसीटीई ने करावा लागेल त्यात तंत्रज्ञानाचा वापर करून करावा लागेल. प्रज्वल व्यापाराचे रिंगण तोडून बाहेर आला याचा मला सार्थ अभिमान आहे. व्यापार सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. सध्या जग टच स्क्रीनवर आहे आणि टच स्क्रीनच्या जमान्यात ह्यूमन टच गेला आहे. ‘ह्यूमन टच इज अल्वेज ग्रेटर द्यान टच स्क्रीन’. नाते सांभाळणं म्हणजेच ह्यूमनच आहे. शिवाजी कोणापुरे यांना संबोधताना ते म्हणाले की, शिवाजीराव आपण आयटीआय कडे लक्ष दिले पाहिजे आपल्या येथून किती विद्यार्थी व्यवसायाला लागले व पुढे लागू शकतील याकडे कटाक्षाने लक्ष पुरून आपली आयटीआय ही भारतात नंबर वन कशी राहील याकडे लक्ष पुरवावे. यावेळी अभियंता साक्षी कुलकर्णी व प्रज्वल कवटीकवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी साक्षी कुलकर्णी म्हणाली की, सुप्रभात मित्रमंडळाने पुंडे काका यांच्या हस्ते माझा केलेला सत्कार मी हा क्षण कधीही विसरू शकणार नाही व मला मिळालेल्या सेवेच्या पहिल्या संधीचे मी सोने केल्याशिवाय राहणार नाही. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुप्रभातचे सचिव जीवन कवटीकवार यांनी केले तर लक्ष्मण पत्तेवार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादाराव आगलावे यांनी केले तर डॉ. वीरभद्र हिमगिरे यांनी आभार मानले.
कार्यक्रमात दिनेश कुलकर्णी, सौ.सुषमा दिनेश कुलकर्णी, प्रशांत कवटीकवार यांच्यासह डॉ. एम.जे. इंगोले, डॉ. आर. जी. स्वामी, नंदकुमार मडगुलवार, गोपाळ पत्तेवार, नारायणराव बिलोलीकर, बालाजी वट्टमवार, उत्तमराव कुलकर्णी, लक्ष्मीकांत चौधरी, मनोज जाजु, सूर्यकांत कपाळे, दिनेश चौधरीसह यावेळी अनेकांची उपस्थिती होती.

