नांदेड ; प्रतिनिधी
माझ्या भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्या परिवारापासून कोसोदूर पाऊस,वारा,थंडी,बर्फ व ऊन्हाच्या झळा सोसत स्वत:च्या जीवाची तमा न बाळगता, आपला प्राण तळहावर घेऊन शत्रूशी दोन हात करण्या सज्ज असलेला वीर भारतीय सैनिक रक्षाबंधन सणा दिनी आपल्या बहिणी कडून राखी बांधून घेण्यापासून वंचित असतो. म्हणून सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारनी गेली एक तपापासून मन्याड-गोदा खोर्यातील शालेय भगीनींच्या ३३३३ राख्या व ३३३३ सदिच्छापत्र सोबत १५ फुटाची महाराखी भारतीय सैनिकांना पाठवून रक्षाबंधन सणाच्या सदिच्छा देण्यासाठी तत्पर
असते.मातृभूमीच्या भक्तीने ओतप्रोत होऊन कंधार शहरातील देशभक्त सहकार्याच्या मदतीने उपक्रम यशस्वी होतो.काल परवाच भारतीय वीर सैनिकांनी मर्दुमकी दाखवत “ऑपरेशन सिंदूर ” या यशस्वी मोहिमेत फक्त २२ पाकड्यांना आस्मान दाखवले. २६ जुलै १९९९ रोजी कारगील युद्धात भारताने पाकड्यांना चारीमुंड्या चीत करुन टाईगर हिल्सवर आम्हा प्राणप्रिय तिरंगा राष्ट्रध्वज फडकवला.या भारतीय शौर्याची आठवण तेवत राहण्यासाठी मातृभूमी प्रतिष्ठाण नांदेड आयोजित कुसूम सभागृहात २६ जून २०२५ रोजी कारगील विजय दिवसाच्या औचित्याने शौर्यगाथा स्मरण दिन कार्यक्रमात जिल्हा सत्र न्यायालय नांदेडचे न्यायमूर्ती मा.सुनिल वेदपाठक यांचे अध्यक्षतेखाली पार पडला.प्रमुख पाहूणे म्हणून नांदेडचे अप्पर पोलिस अधिक्षक मा.सुरज गुरव आणि डाॅ.नितीन मंगला जयतिर्थ जोशी उपस्थित होते.तर प्रमुख वक्ते व मार्गदर्शक मा.ब्रिगेडियर सुमंत दशरथ पूणे (अग्निवीर…एक देश सेवेची अपूर्व संधी) यांचे समर्थ हस्ते मन्याड-गोदा खोर्याच्या स्फूर्तिदायक रक्षाबंधन उपक्रमाचा गौरव सन्मानाचे सॅलूट,अशोक वृक्षराज रोप,शाल व सन्मान पत्र देऊन गौरविले.हा नंदीग्राम नगरीत झालेला गौरव माझा नसून तमाम मन्याड-गोदा खोर्यातील शालेय भगीनींचा व देशभक्त भारतीयांचा आहे अशी प्रतिक्रिया यावेळी दत्तात्रय एमेकर यांनी दिली.
या कार्यक्रमात नांदेड शहरातील निबंध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमा ठिकाणी जि.प .प्रा.शा.पिंपळगाव (सी) ता.किनवट जिल्हा नांदेड या किनवट भागाच्या आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या करकमलाच्या हस्तकलेतून निर्माण झालेल्या विशाल राख्या आणि सदिच्छापत्र सुपुर्द केले.या प्रसंगी धो-धो पाऊसातही देशभक्तांची उपस्थिती कारगील युद्धात भारतीय जांबाज सैनिकांनी बजावलेल्या विजयी शौर्याची साक्ष देत होती.या प्रसंगी नांदेड शहरात रक्षाबंधन उपक्रमाचे कार्यवाह माझे बंधुराज साईनाथ एमेकर व आमचे सारथी सुधाकर तुपकर यांची संगत सावली सारखी होती.सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

