लोहा, ता. ३( ता.प्र.)
” पत्रकारिता, साहित्य क्षेत्रापासून सर्वच क्षेत्रात गांभीर्याने पहावे लागते. जीवन जगत असताना विश्वासहर्ता, निष्ठा, कृतीशीलता, औदार्य या गोष्टीने भारलेले जीवन असेल तर बहुआयामी म्हणून त्याची कीर्ती होते. बापू गायकर हे त्यापैकी एक आहेत. समाजात बहुआयामी माणसं फार कमी सापडतात, ” असे प्रतिपादन नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते पंचशील कांबळे यांनी केले.
बंजारा समाजाचे युवा उद्योजक विष्णू भाऊ चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तालुक्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. बातमीदार बापू गायकर यांच्या गौरव करण्यात आला. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पदावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे भीमकीर्तीराज कलंबरकर, माळेगाव येथील खंडोबा देवस्थानचे अंबादास पाटील जहागीरदार, पंडितराव फाजगे, शिवसेनेचे युवा नेते बाळासाहेब कराळे, स्वराज्य शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष तथा पत्रकार अंबादास पाटील पवार, बंजारा नेते पिंटू जाधव,चंद्रकांत कांबळे, शिव जाधव, विजय राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
लोहा तालुक्यातील शून्यातून क्रांती करणाऱ्या व्यक्तींचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तीत डॉ. गजानन राठोड, सकाळचे बातमीदार बापू गायकर, माजी केंद्रप्रमुख तुकाराम कलंबरकर, हॉटेल व्यवसायिक शंकरराव होणराव, शासकीय कंत्राटदार नारायण जाधव,अर्जुन राठोड यांना गौरविण्यात आले.
सेवादास नगर येथील शिल्पकार तथा सामाजिक कार्यकर्ते विष्णू भाऊ चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला. लोहा तालुक्यातील विविध चळवळीतील आदर्श व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी लोहा शहर वृक्ष लागवडीतून ‘ऑक्सिजन पार्क’ करण्याचा संकल्प करण्यात आला.युवा नेते पंचशील कांबळे म्हणाले, ” समाजाप्रती उत्तरदायित्व निभावत असताना स्वतःपासून सुरुवात करावी लागते. निरीक्षण ही त्यांची महत्त्वाची शक्ती असते. त्यातूनच इतरांना वाहून कसे घेता येईल हा नकळत मूलमंत्र सापडतो. गुणवंतांचा गौरव पुढल्या पिढीसाठी दिशादर्शक असतो. यावेळी रवी चव्हाण,राहुल पवार गजानन चव्हाण, राहुल चव्हाण, उज्वल चव्हाण आदींची उपस्थिती होती.

