भारतीय लोकशाहीही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे.आपला देश हा १४० कोटीपेक्षा जास्त लोकसंख्येचा देश आहे.येथे हजारो जाती,शकडो धर्म,पंथ,वंश आनंदाने नांदत आहेत.येथे विधिध भाषा,संस्कृती,रूढी,परंपरा आहेत.भारतात पराकोटीची आर्थिक विषमता आहे.तरी देशवासी गुण्यांगोविंद्याने नांदत आहे.आशा देशात सत्तेवर येणे म्हणजे केवळ निवडणूक जिंकणे नाही.तर येथील जनतेशी थेट संवाद साधने महत्वाचे आहे.यासाठी जनतेचे मूलभूत प्रश्न,समस्या समजून घ्यावे लागतात.मतदाराचा कल ओळखावा लागतो.मतदाराचे मन जिंकावे लागतात.
भारतीय लोकशाहीची खरी ताकद आहे जनतेचा थेट सहभाग.राजकीय शक्ती म्हणजे केवळ निवडणूक जिंकणं नाही.राजकारण म्हणजे जनतेचं प्रतिनिधीत्व करणे.
जनतेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेणे.राजकीय सत्ता म्हणजे केवळ पंतप्रधान,मुख्यमंत्री,आमदार, खासदार होणे नाही.सत्ता म्हणजे लोकांच्या भावना,इच्छा आकांक्षा यांच्यावर प्रभाव टाकण्याची क्षमता होय .
आजची लोकशाही कशी आहे ?सध्याची लोकशाही आणि मतदार म्हणजे हिटलर आणि त्याचा कोंबडा या गोष्टी सारखी झालेली आहे. भारतातील सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या विचारानुसार आजची अधुनिक लोकशाहीची व्याख्या म्हणजे ” लोकसहभाग नसलेली,लोकसहभागापासून कोसो दूर गेलेली आणि लोकांना विकत घेणारी शासन पद्धती म्हणजे लोकशाही होय.”आशी झालेली आहे.तरी भारतीय राज्यघटनेमुळे लोकशाही जीवंत आहे.आज भारतीय तरुण जागृत होत आहे. घटनेनुसार लोकशाही टिकली पाहिजे,ती जोपासली गेली पाहिजे यासाठी ते धडपडत आहेत.लोकशाही वाचवायची असेल तर सामन्य तरुणांना राजकारणात उतरावं लागेल. स्व:ताचं स्वार्थ साधणाऱ्यां राजकारण्यांना धडा शिकवावा लागेल.त्यासाठी तरुणांना खालील मार्गाचा अवलंब करावा लागेल.
आतापर्यंत राजकारण्यांनी निरक्षर लोकांचा गैरफायदा घेतलेला आहे.लोकशाही कोणासाठी आहे हे सामान्य अशिक्षित भारतीयांना कळूच दिले नाही.अज्ञानाचा फायदा घेवून आज राजकारणातून सत्ता उपभोगणाऱ्यांचा एक वर्ग,एक जात निर्माण झालेली आहे. ग्रामपंचायतीपासून दिल्लीपर्यंत लोकशाहीच्या ऐवजी घराणेशाहीची सत्ता चालू झालेली आहे. म्हणून तरुणांनी शिक्षण घेतले पाहिजे.आधि गावातील सत्तेची घराणेशाही संपवली पाहिजे.गावतील इतर तरुण फक्त संतरंज्या उचलायच काम करत आहेत.ते त्यांनी बंद केलं पाहिजे.असं घडू नये म्हणून तरुणांनी शिक्षण घेवून इतरांना शिक्षणासाठी प्रेरीत केले पाहिजे. आता मोठे राजकारणी आपल्या सामन्य लोकांसाठी “बडा हूवा तो क्या हूवा,जैसे पेड खजूर.पंथी को छाया नही,फल लागे अति दूर.”
आपल्यासाठी बड्या नेत्याचं काय उपयोग आहे.
आतापर्यंत राजकारणापासून दूर राहिलेल्या समाजातील तरुणांना घटनेतील मुलभूत हक्क आणि कर्तव्य याची माहिती करुन घ्यावी लागेल.घटनेतील कलम १२ते ३५यात दिलेले मूलभूत अधिकार आणि कर्तव्य समजून घ्यावे लागतील.भारतातील सामन्य तरुणांना घटनेतील समता आणि समानता यांचा अर्थ आणखी कळालेलं नाही.समता म्हणजे काय ? समानता म्हणजे काय ?यांचा अर्थ समजून घेवून समता आणि समानता समाजात आणण्यासाठी संघर्ष करावा लागेल. त्यासाठी राजकारण करावं लागेल.
आतापर्यंत सत्ताकारणापासून दूर राहिलेल्या,राजकारणापासून दूर राहिलेल्या, सत्तेत वाटा मिळत नसेल्या समाजातील तरुणांनी समाजाला सत्तेत वाटा मिळवून द्यावयाचे असेल तर स्वतः अंधश्रध्देपासून दूर राहिला पाहिजे. दारु,गांजा,आफू,तंबाखूपासून दूर राहील पाहिजे. निर्वेसणी राहूण समाजाला जागृत केले पाहिजे. राजकारणात सक्रीय भाग घेण्यास प्रवृत केले पाहिजे.
सत्तेत वाटा पाहिजे असेल तर लोकांचा सहभाग आवश्यक आहे.भारतातीत सध्याचं राजकारण विधिव जाती,जमाती,वंश,पंथ,धर्म आणि भाषेच्या ओळखीवर चालू आहे.प्रस्थापित राजकारणातील लोकांना धडा शिकवायचं असेल तर समाजातील विविध गटाशी समन्वय साधावं लागेल.सत्ता मिळवायची आसेल तर वेगवेगळ्या गटातील लोकांचा विश्वास संपादन करावं लागेल.आजकाल जात,धर्म,भाषा,लिंग,प्रांत हे राजकीय डावपेचामध्ये महत्त्वाचे मुद्दे ठरत आहेत. यावरच साकारणाची खेळी चालू आहे.आपल्या प्रत्येक समाजात ओळख आधारीत राजकारण महत्वाचं ठरत आहे.मग आपला समाज एकत्र करा. आपण मागे का राहता.जनतेशी थेट संबंधही विश्वासार्ह नेतृत्वाची पाहिली पायरी आहे.आपल्या समाजाचा सत्तेत सहभाग हवा असेल तर जनतेशी थेट संबंध वाढवा.केवळ निवडणूकीपुरतं संबंध ठेवून चालणार नाही.जनतेशी संबंध न ठेवता कदाचीत तुम्हाला यश मिळेल पण ते अल्पकालीन असेल.लोकसंपर्क म्हणजे लोकांमधे केवळ भाषांणबाजी करू नका.तर आपल्या समाजाचं दुःख समजून घ्या.त्यांच्या खांद्यांला खांदा लावून त्यांच्या सोबत चाला.त्यांच्यात मिसळून त्यांचे काम करा.आडचणीत त्यांना मदत करा.त्यांच्यात मिसळा.त्यांच्यावर विश्वास ठेवा.त्यांना आपलसं करा.एकीचं महत्व पठवून द्या.
निवडणूक आली की पायलीचे पाचशेर नेते येतात.खरं नेतृत्व हे सामाजिक कार्यातून निर्माण होते हे विसरू नका.मतापूरतं राजकारण करू नका.सत्तेचा खरा पाया सामाजिक कार्यात आसतो.सामाजिक कार्य म्हणजे समाजसेवा आणि समाजाशी बांधिलकी ठेवा.गरीब गरजू लोकांसाठी अन्नछत्र,विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, महिलासाठी आरोग्य सुधिवा,शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी मदतीचे उपक्रम घेवून जनतेच्या काळजात जागा निर्माण करा.यातून “इमानदार ” नेता बना.समाजकारणातून राजकारणात प्रवेश करा.निश्चित यशस्वी व्हाल.
सत्ता म्हणजे लोकांवर प्रभाव टाकण्याची क्षमता आहे.राजकारणात यशस्वी होण्यासाठी लोक संपर्क महत्त्वाचं आहे;पण त्याचबरोबर आपणास आर्थिक बाबीचाही विचार करावं लागेल.येथे केवळ सिध्दांतवर चालता येणार नाही.वास्तव स्विकारून काम करावयास पाहिजे. राजकीय ताकद ही केवळ लोकांच्या पाठिंब्यावर चालत नाही.आज ती चालते आहे साधनसंपत्तीवर.सत्ता दिर्यकाळ टिकावयची, रहावयाचे असेल तर आर्थिक साधनांची उभारणी करावीच लागेल.उमेदवार उभे करणे , कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण,कार्यालय,पोस्टर, जाहिराती,सभा,वहाने आणि इतर माध्यमासाठी पैसा लागतो. यासाठी पैसा उभारावा लागेल.
आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्या भागातील छोटे व्यापाऱ्यांशी चांगले संबंध ठेवून चंदा संकलन करता येईल.मुलाखती,कार्यशाळा, प्रशिक्षण सत्र,स्वंयसेवी संस्थाकडून,स्वःताच योगदान यातून निधी जमा करता येईल.मात्र यात पारदर्शकता आवश्यक आहे.कारण पापाचं बाप पैसा आहे.भारत हा आजघडीला तरुण भारत आहे. भारताची ६० टक्के लोकसंख्या पस्तीस वर्षाखालील आहे.भविष्याची जबाबदारी पेलण्यासाठीच नव्हे तर वर्तमान सत्ता मिळविण्यासाठी तरुणांनी काम करावयास पाहिजे.तरुणांच्या सहभागाने राजकारणात नवचैतन्य,नवीन उर्जा व नव विचार निर्माण होतील.राजकीय ताकद वाढविण्याचा हाही एक मार्ग आहे.यासाठी तरुण वर्ग एकमेकांशी संवाद साधला पाहिजे.एकमेकांच्या समस्या सोडवाल्या पाहिजेत.यासाठी प्रसारमाध्यमांचा,विद्यार्थी संघटना,युवामंच,खेळ आणि वेगवेगळे कार्यक्रम यातून हे काम करता येईल
संघटना आणि नेतृत्व निर्माण करणे आवश्यक आहे.संघटना म्हणजे काम करणाऱ्या लोकांचा समूह नाही तर यामध्ये कार्यकर्ते,नेते, प्रचारक व प्रशासन हे सर्व घटक एकत्र येतात. संघटनेचा उद्देश लोकांपर्यत पोहचणे,धोरण आखणे,विरोधकांशी सामना करणे आणि यातूनच नेतृत्व तयार करावं लागेल.नेता म्हणजे कोण ?जो जनतेशी योग्य संवाद साधतो,संघटना सांभाळतो, धोरणं आखतो आणि संकटकाळात जनतेला योग्य मार्गदर्शन करुन अचूक मार्गावरून घेवून जातो तो नेता.संघटना,धोरण आणि नेतृत्व या तिन्ही गोष्टीतून राजकीय शक्ती उभी करता येते हे विसरू नका तरुणांनो.
तरुणांना राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर समाजातील प्रसार माध्यमांचा योग्य वापर करता यावयास पाहिजे.चालू काळात माध्यम आणि राजकारण याचं जवळचं नातं आपण पहात आहोत.टिव्हीचं पहाणा.न्यूज चॅनलवरून नेत्याची प्रतिमा तयार करता येते. माध्यमाद्वारे केवळ माहितीच नव्हे तर दूरदर्शी नेता,इमानदार नेता,लोकप्रिय नेता,लोकनेता, जनतेचा राजा,सामान्याचा कैवारी,उद्योगपती, तरुणांचे प्रेरणास्थान,भावी आमदार आशी प्रतिमा तयार करता येते.तसेच भ्रष्टाचारी म्हणूनही प्रतिमा तयार होते.प्रसार माध्यमांचं योग्य वापर झाल्यास एखाद्या छोट्या नेत्यालाही राष्ट्रीय ओळख मिळू शकते.म्हणून माध्यमांचा योग्य व काळजीपूर्वक वापर करण्यास शिका.तरुणांनी विशेष करून राजकीय क्षेत्रापासून दूर असलेल्या तरुणांनी निषेध सभा , वेगवेगळ्या चळवळीत सहभाग घेवून पुढे आले पाहिजे.जनतेच्या आवाजाला न्याय मिळवून देण्यासाठी,समाजाच्या हक्कासाठी, सामाजिकबदलासाठी,जनतेला अधिकार मिळवून देण्यासाठी चळवळी महत्वांच्या आहेत.याद्वारे राजकाराणात जनतेचा दबदबा निर्माण करता येते.सत्ताधाऱ्यांना वेसण घालता येते,सत्ता कल्याणकारी बनते.
राजकारणापासून आतापर्यत दूर राहिलेल्या समाजाला राजकारणात अस्तीत्व दाखवायचं असेल तर नारी शक्तीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.तसेच आपण ज्या जातीत आहोत त्या जातीच्या लोकाला राजकारणात साक्षर केले पाहिजे.जरांगे पाटील महाराष्ट्र , हार्दिक पटेल गुजरात,हरियाणातील जाट यांनी एकत्रित इच्छाशक्तीचं दर्शन व राजकीय ताकदीचं आपणास दर्शन घडविले आहे;पण आपणास विनंती आहे की जातीचं राजकारण करताना इतर जाती,धर्म,स्त्री पुरूष भेद,भाषिक ओळख, प्रांतिक अस्मिता याचं संयमाने व समतेच्या दृष्टीकोनातूनच वापर करा.भारतीय राजकारणात धर्मला वेगळेच महत्व प्राप्त झालेले आहे.सध्याचं राजकारणक धर्माभोवती फिरत आहे.कमी आधिक प्रमाणात सगळेच पक्ष राजकारणात धर्मला महत्व देत आहेत.आपल्या देशात हिंदू,मुस्लीम,खिश्चन,शिख या धार्मिक समुदांयाचा प्रभाव दिसून येतो आहे. सध्या तर भारतीय नेते सण,उत्सव,धार्मिक समारंभामध्ये सक्रीय पणे उपस्थित राहात आहेत.विशिष्ट समुहांसी संबंध मजबूत करत आहेत.आपण धार्मिक सहिष्णुता जपली पाहिजे टिकवली पाहिजे.महिला व आतापर्यंत राजकारणात ज्यांना सहभाग करण्यात आलेले नाही.त्या गटांना योग्य संधी मिळाली पाहिजे.
.विशिष्ट समुदायाचेच राजकारणात वर्चस्व निर्माण झालेले आहे.लोकशाहीत समाजातील सर्व घटकांना लोकशाहीचं फळ चाखता आले पाहिजे यासाठी समाजातील सत्तेत नसलेल्या समुदायात नेतृत्व विकास करणे गरजेचे आहे.यामुळे संघटन कौशल्य,मनोधैर्य, सृजनशीलता वाढीस लागेल.राजकारणात यशस्वी होण्यासाठी योग्य प्रशिक्षणाची गरज आहे. प्रशिक्षणातून नेतृत्व विकास महत्वाचं आहे.नेतृत्व गुण,भाषण कौसल्य,संवाद कौसल्य,धोरणात्मक विचार आणि प्रभावी जनसंपर्क कसा वाढवावा याचं प्रशिक्षण झालं पाहिजे.यातून त्यांचा आत्म विश्वास वाढविता येईल.यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण शिबिरे,कार्यशाळा आयोजीत करता येतील.राजकारणात मागास आसलेलं नेतृत्व पुढे येईल.
नेतृत्व निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायत हे एक महत्वाचे माध्यम आहे.खासदार,आमदार, मंत्री,मुख्यमंत्री यांचा सत्तेचा मार्ग ग्रामपंचायतमधूनच जातो.तरुणांसाठी ग्रामसभा ही एक प्रभावी व्यासपीठ आहे.ग्रामसभेत गावातील प्रत्येक नागरिक निर्णय प्रक्रियेत थेट सहभागी होतो.तरूणांनी राजकारणाचे धडे पंचायतराजमध्ये घेवून स्वतःची राजकीय कारकिर्द घडवू शकतात.तरुणानो तत्वाचं,आदर्श राजकारण करुन आपला देश,आपला समाज,मानवता,लोकशाही सक्षम बनवूया.आपण प्रथम भारतीय बनू या.आपण सुशिक्षित होवून अंधश्रद्धा,अंधभक्ती,अंध विश्वास सोडून अधुनिक विचार,वैज्ञानिक, तर्कसंगत,धर्मनिरपेक्ष विचार स्विकारू या.संवेदनशील बनू या.देश मजबूत बनवू या.
©® राठोड मोतीराम रूपसिंग
विष्णुपूरी , नांदेड – ६
९९२२६५२४०७ .

