*२५वी व २६वी अमरनाथ यात्रा तसेच १७वी व १८वी चारोधाम यात्रा यशस्वी झाल्या प्रित्यर्थ धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दोन ठिकाणी आयोजित केलेल्या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी महाप्रसाद ग्रहण केला असून यावेळी २५व्या अमरनाथ यात्रेमध्ये अन्नदान करणाऱ्या अन्नदात्यांचा, भाऊचा माणुसकीचा फ्रिज, लायन्सचा डबा, क्षुधा शांती,कृपाछत्र,मायेची ऊब या उपक्रमातील दानशूर नागरिकांचा तसेच अमरनाथ यात्रेला विस्तृत प्रसिद्धी देणाऱ्या माध्यम प्रतिनिधींचा यथोचित सत्कार करण्यात आला.*
सतत सविस वर्ष्यापासून महाप्रसादाचेआयोजन करण्यात येते.या वर्षी श्रावण सोमवारी गोवर्धनघाट च्या सिद्धेश्वर महादेव मंदिर व रविवारी स्वामी समर्थ मंदिर या दोन्ही ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन सौ.जयश्री व धर्मभूषण ॲड. दिलीपभाऊ ठाकूर,सौ.बिना व राजेशसिंह ठाकुर, सौ.सुनिता व संजय कलकोटे, सौ.वंदना व वैजनाथ फड,सौ.सुषमा व नरसिंह ठाकूर,लक्ष्मी टेंकाळे, शोभा नंदलवार, सुरेखा गादेवार,स्नेहलता जायस्वाल,विमलताई चव्हाण लोहा,जयप्रकाश येवले यांनी केले होते.नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे अनेकांनी हा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा सल्ला दिला. परंतु दिलीप ठाकूर यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवून कार्यक्रम करण्याचा निश्चय केला.सुदैवाने रविवारी शहरात इतरत्र पाऊस पडला पण कलामंदिर परिसरात पाऊस न पडल्यामुळे महाप्रसादा मध्ये कोणताही व्यत्यय आला नाही. जयश्री व दिलीप ठाकूर यांच्या हस्ते सकाळी अभिषेक व दुपारी महाआरती करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.दिलीप ठाकूर यांनी विक्रमी तब्बल २६ वेळा अमरनाथचे,३१ वेळा वैष्णोदेवीचे आणि ३१ वेळा अमृतसर येथील सुवर्णंमंदिराचे दर्शन घेतल्याबद्दल प्रतीक्षा केंद्रे , ज्योती व विनायक किन्होळकर, सुनीता व सुधाकर केंद्रे ,बालाजी व अनिता ढाकणे, रूपाली व शैलेंद्र वडजकर यांच्यासह अनेकांनी सत्कार केला. यात्रेमध्ये अतिशय उत्तम व्यवस्था केल्याबद्दल वसु व जयंतीलाल पटेल, सुप्रिया व सुरेश कुलकर्णी ,चित्ररेखा व नारायण पांडे, दत्ता व गिता पावडे ,छाया व उद्धव केंद्रे,अरुणा व दिगांबर गिरी ,साईप्रसाद हळदे ,सुरेश घुगे ,जयमाला लटपटे,अमरसिंह चव्हाण,प्रविण सराफ ,नरेंद्र जोशी
माधव बामणे यांच्यासह इतर अमरनाथ यात्रेकरूनी चांदीचा गणपती व मोदी जॅकेट देऊन दिलीपभाऊंचा सपत्निक सत्कार केला. अमरनाथ यात्रेमध्ये चांगली सेवा दिल्याबद्दल राजेशसिंह ठाकूर, सुभाष देवकत्ते, ज्योती व रामेश्वर वाघमारे, सुरेश शर्मा यांचा दुलाजी व वंदना सुर्यवंशी , सुरेखा व चंद्रशेखर मुंढे, सपना व राजू सतलावार , शंकर कासटवार,निखिल चव्हाण, शर्वरी वडजकर,माधवी जोशी यांनी सन्मान केला. यावेळी यात्रेकरूतर्फे स्वामी समर्थ मंदिरात दोन दानपेटी देण्यात आल्या. अमरनाथ यात्रेत अन्नदान केल्याबद्दल नागेश शेट्टी,रेखा भताने,अमोल गोळे,द्वारकादास अग्रवाल, स्नेहलता जायस्वाल, निर्मला व पद्माकर केंद्रे,विजया व दत्ता खानजोडे,सारिका व रविंद्र केंद्रे, ज्योती व सुधीर शिवणीकर, कल्पना व अजय संगेवार, सुनीता सुनील व्यवहारे यांचा एक मुखी रुद्राक्ष, मोत्याची माळ देऊन सन्मान करण्यात आला.दिलीप ठाकूर यांच्या विविध उपक्रमात सक्रिय सहभागी होणा-या सर्वांना गौरविण्यात आले.याप्रसंगी भाजप पदाधिकारी तसेच अनेक माध्यम प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.अमरनाथ यात्रेकरूंनी ठेवलेल्या दोन्हीही महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वामी समर्थ मंदिराचे अध्यक्ष हेमंत गिते,अशोक साखरे, प्रभुदास वाडेकर,प्रकाश उंटवाले, जगतसिंह ठाकूर, संतोष बच्चेवार, सुरेश निलावार,कामाजी सरोदे, विजय वाडेकर,रिंकू सावळे,शुभम येडके यांनी परिश्रम घेतले.

