कंधार ;( दिगांबर वाघमारे )
कंधार शहरात विद्युत वितरण कंपनीचा अनागोंदी कारभार व गलथान कारभारामुळे नागरिक ,ग्राहक, व्यापारी हे वैतागले आहेत . महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या या अशा गलथान कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे .याकरिता विद्युत ग्राहक संरक्षण मंचाच्या वतीने दिनांक ७ ऑगस्ट रोजी कंधारवासीयांच्या वतीने कंधार शहरातील विद्युत वितरण कंपनीचा कार्यालयावर निदर्शने करण्याचे निवेदन ४ ऑगस्ट रोजी देण्यात आले होते . त्याची तात्काळ दखल घेऊन विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता पठाण यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन दिलेल्या निवेदना संदर्भात उचित कारवाई करू असे लेखी आश्वासन दिले त्यामुळे दि. ७ ऑगस्ट रोजी होणारे निदर्शने तात्पुरते स्थगित केलेले आहे अशी माहिती भाजपचे कंधार शहराध्यक्ष ॲड गंगाप्रसाद यन्नावार यांनी दिली .
शहरात अनियमित वीज पुरवठा,
विद्युत देयके वसुलीच्या नावाखाली कर्मचारी,अधिकारी यांची दंडेलशाही,ग्राहकाच्या तक्रार निवारणाकडे दुर्लक्ष,चुकीच्या रीडिंग द्वारे विद्युत देयके,विद्युत मीटर ग्राहकाच्या सहमतीशिवाय बदलणे,फ्युज कॉल सेंटरची सुरुवात करणे यासह अनेक समस्यांचे तात्काळ निराकरण नाही झाल्यास महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयावर कंधारवासीयांच्या वतीने भव्य असा फ्यूज बल्ब मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनात दिला होता . या निवेदनाच्या प्रती मा ना देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री महाराष्ट्र राज्य, सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कंधार यांना दि ४ ऑगस्ट रोजी भाजपाचे शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार यांच्या वतीने देण्यात आल्या होत्या.
परंतू तात्काळ विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता पठाण साहेब यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन दिलेल्या निवेदना संदर्भात उचित कारवाई करू असे लेखी आश्वासन दिले त्याकरिता दि ७ ओग्स रोजी होणारे निदर्शने तात्पुरते स्थगित केलेले आहे.दिलेल्या तक्रारीचे निराकरण नाही झाल्यास पुनच्छ आंदोलन करण्यात येईल असे यावेळी त्यांना सांगितले अशी माहितीही यावेळी ॲड गंगाप्रसाद यनावार यांनी दिली .


