होय, आता असंच म्हणावं लागतं.
कधीकाळी गजबजलेली दोन गावे— हसनाळ आणि रावणगाव —आज नामशेष झाली आहेत. गावच्या पायथ्याशी उभा ठाकलेल्या लेंडी प्रकल्पाने या दोन्ही गावांना गिळंकृत केलं.परवा आम्ही तिथे गेलो. गावकऱ्यांचा आक्रोश ऐकला. कुणी म्हणालं “यंत्रणा चुकली”, कुणी म्हणालं “मायबाप सरकार चुकलं”, तर कुणी आपलंही काहीतरी चुकल्याचं मान्य केलं. पण खरं कुणाचं चुकलं? याचं उत्तर अजून मिळालेलं नाही.
अचानक आलेल्या पुराच्या पाण्याने सर्वस्व हिरावून घेतलं.
रात्रभर अंधारात गावं गटांगळ्या खात होती. पाणी अंगणातून घरात शिरलं, आणि बघता बघता छतापर्यंत पोहोचलं. कुणी गाढ झोपेत होते, कुणी जीवाच्या आकांताने बाहेर पळाले. कुणी वाचले, कुणी गुदमरून गेले.मुकी जनावरं साखळदंडासकट वाहून गेली.
पक्क्या रस्त्यांची, मोठ्या शहरांची चमक इथे कधीच पोहोचली नव्हती. अजूनही पक्क्या रस्त्याविना ही गावे जगत होती. आणि आता कपड्यांवरच्या कपड्यांसह लोक घरं सोडून बाहेर पडले. पोटाला चिमटा देऊन साठवलेलं वैभव क्षणात वाहून गेलं.एका तरुणाने जीवाची बाजी लावून बायकोला वाचवायचा प्रयत्न केला. स्वतः वाचला, पण बायको गेली… या हकिकती ऐकून गावभर रडवेला झाला.
—
साहित्य परिषदेचा उपक्रम
ही भीषण बातमी वाऱ्यासारखी पसरली. नांदेड येथील मराठवाडा साहित्य परिषद शाखेची तातडीची बैठक शाखाध्यक्ष बालाजी इबितदार यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
सहकार्यवाह कथाकार व पत्रकार राम तरटे यांनी भावनिक प्रस्ताव मांडला :
“आपण लेखक म्हणून यथाशक्ती मदतीला धावून गेलं पाहिजे.”त्यांचा प्रस्ताव सर्वांनी उचलून धरला.
लेखकांनी मदतीचे हात पुढे केले. निधी जमा झाला. त्या निधीतून शालेय विद्यार्थ्यांसाठी वह्या, पुस्तके, पिशव्या असे साहित्य घेतले गेले. एक टेम्पो भरून हे साहित्य गावात पोहोचवले.हो, खरं तर तिथे आभाळच फाटलं होतं. आणि त्या फाटलेल्या आभाळाला छोटसं ठिगळ लावण्याचा हा प्रयत्न होता.
निरागस लेकरांचे हसरे पण पाणावलेले चेहरे पाहून सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आलं. गावात इतकी दुर्गंधी होती की, “कधी एकदा बाहेर पडावं” असं वाटत होतं.—
नम्र निवेदन
मुखेड तालुक्यातील हसनाळ आणि रावणगाव येथे अतिवृष्टीमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
घरगुती साहित्य, अन्नधान्य आणि विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य वाहून गेले आहे. शासन, खाजगी संस्था आणि दानशूर व्यक्तींकडून मदतीचा ओघ सुरू आहे.त्या मदतीत मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेड यांचाही खारीचा वाटा असावा, या भावनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ववत सुरू ठेवता यावे, यासाठी आपण आपला सहभाग नोंदवावा.सहभाग पाठवण्यासाठी संपर्क :
📞 राम तरटे – 8600852183 (PhonePe / UPI)—
मदत करणाऱ्यांची यादी
🌸 संजीव कुलकर्णी – 1100
🌸 देवीदास फुलारी – 1000
🌸 महेश मोरे – 1000
🌸 व्यंकटेश चौधरी – 1000
🌸 श्रीनिवास मस्के – 1000
🌸 पी. विठ्ठल – 1000
🌸 धाराशिव शिराळे – 1000
🌸 अमृत तेलंग – 500
🌸 रोहिणी पांडे – 500
🌸 शिवा जोगदंड – 500
🌸 प्रा. मधुसूदन देशमुख – 1100
🌸 गजानन मुधोळ पाटील – 1100
🌸 दिगंबर कदम – 500
🌸 राम तरटे – 1000
🌸 सुचिता खल्लाळ – 500
🌸 व्यंकटेश काटकर – 500
🌸 डॉ. दिलीप चव्हाण – 1000
🌸 गोविंद नांदेडे – 1100
🌸 अनुजा डोईफोडे – 1000
🌸 प्रफुल कुलकर्णी – 500
🌸 शिवा कांबळे – 500
🌸 डॉ. पी. डी. जोशी – 800
🌸 डॉ. वृषाली किन्हाळकर – 1500
🌸 प्रभाकर साळेगावकर – 500
🌸 प्रा. राम जाधव – 500
🌸 देवीदास तारु – 1000
🌸 वैशाली गोस्वामी – 1000
🌸 योगिनी सातारकर – 1000
🌸 निशा डांगे – 500
🌸 डॉ. माधव बसवंते – 1000
🌸 प्रा. मनोज बोरगावकर – 1111
🌸 अंजली मुनेश्वर – 500
🌸 डॉ. सुरेश सावंत – 500
🌸 स्वाती कान्हेगावकर – 500
🌸 लक्ष्मी पुराणशेट्टीवार – 1000
🌸 डॉ. नारायण शिवशेट्टे – 1000
🌸 प्रा. कचरे सर – 500
🌸 डॉ. अच्युत बन – 1000
🌸 प्रा. ललिता शिंदे बोकारे – 1000
🌸 प्रा. शंकर इभूते – 1000
🌸 डॉ. अशोक गवते पाटील – 1100
🌸 प्रा. श्रीनिवास पांडे – 1000
🌸 प्रा. संजय जगताप – 1000
🌸 दत्ता डांगे – 1000
🌸 योगीराज माने – 1000
🌸 शशिकांत शिंदे – 500
🌸 बापू दासरी – 1000—
कृतज्ञता
ज्यांनी सहकार्य केले त्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार.
आपण सर्वजण एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत राहू या, हीच सदिच्छा.🙏💐 धन्यवाद 💐🙏

