अनुसूचीत जातीच्या लाभ वंचित घटकांना सामजिक न्याय मिळवायचा असेल तर त्यासाठी स्वतःचे आयुष्य चळवळी साठी समर्पित करावे लागेल असा विश्वास मनात व प्रत्यक्ष कृतीत आणून काम करणारे व्यक्तीमत्व अर्थात लोक स्वराज्य आंदोलन या सामजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमचे श्रद्धास्थान माननीय प्रा रामचंद्र भरांडे सर यांचा आज वाढदिवस त्या निमित्ताने प्रथम वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यांत एका सर्व सामान्य कुटुंबात भरांडे सर यांचा जन्म झाला. आई वडिलांचे कृपा छत्र लहानपणी हरवले आणि जीवनाच्या संघर्षाला सुरुवात झाली. आजी ने सांभाळ केला.काबाड कष्ट करुन शिक्षण घेत असतानाच महा मानवांच्या समाज परिवर्तनाचे स्वप्न उराशी बाळगून संघर्षाची वाट धरली. सामजिक चळवळीचे नेतृत्व कै.व्ही. जी. रेड्डी साहेब. जी एस दादा कांबळे यांच्या सोबत सामजिक चळवळी तून कामाची सुरुवात झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद (संभाजी नगर) येथे पदवी व पदव्युत्तर अभ्यास क्रम पुर्ण करुन वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापक नेमणुकीच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर आपले व कुटुंबाचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी एखादया महा विद्यालयात प्राध्यापकाची नोकरी करुन सुखाने आयुष्याची सुरुवात करता आली असती मात्र सामजिक प्रश्न सोडवण्यासाठी लाखो रुपये मिळणाऱ्या नोकरीवर पाणी सोडून पुर्ण वेळ सामजिक क्षेत्रात परिवर्तन करण्यासाठीं स्वतःला चळवळी सोबत समर्पित करून घेतले.
अनेक ठिकाणी होणाऱ्या सामजिक अन्याय अत्याचार असो की शैक्षणिक प्रश्न उपस्थित झाल्यावर धाव घेऊन सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी दिवस रात्र प्रवास केला. मिळेल ते साधन व मिळेल ती भाकर भाजी खाऊन कोणतेही राजकिय पद प्रतिष्ठा व पैशाची आपेक्षा न करता दिवस रात्र संघर्ष करीत लोक स्वराज्य आंदोलन या सामजिक संघटनेची उभारणी केली.
अनेक शासकीय नोकर शिक्षक प्राध्यापक वकील डॉक्टर इंजिनिअर यांना सोबत घेऊन सर्व सामान्य जनतेच्या न्याय हक्का साठी लढा उभा केला.मजूर,हमाल,रिक्षाचालक, विट भट्टी मजूर, ऊस तोडणी कामगार यांच्या सर्वांगीण विकास करायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि शिक्षण मिळवायचे असेल तर त्यासाठी संधी मिळाली तर शक्य आहे हा ठाम विचार करून अनुसूचीत जातीच्या आरक्षणाचे उप वर्गीकरण करावे हा विचार घेऊन क्रांती गुरू लहुजी साळवे,महात्मा फुले राजश्री शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन सामजिक न्याय प्रस्तापित करुन सर्व सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे या साठी अनेक व्याख्याने,मोर्चे,आंदोलने पद यात्रा परिसंवाद आयोजित केले. शिकत शिकत लढा व लढत लढत शिका हा मुल मंत्र देऊन अनेकांना शिक्षणाच्या संधी मिळवून दिली.
जवळा (पारनेर) अहमद नगर, येवला ते नाशिक, लोहा ते लातूर नांदेड ते नागपूर या पदयात्रा काढून सामजिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. १८ डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर अनुसूचीत जातीच्या आरक्षणाचे उप वर्गीकरण करावे यासाठी मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चावर पोलिसांनी लाठी चार्ज करुन आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला स्वतः जखमी झाले या आंदोलनात शेकडो लहू सैनिकांचे रक्त सांडले. मात्र सरकार विरोधाचा संघर्ष या लाठी चार्ज ने द्विगुणित झाला. कार्यकर्त्यांनी स्वतःची मेहनतीच्या कमाई मधून बोलेरो गाडी भेट देऊन चळवळीस बळ दिले.
अनुसूचीत जाती आरक्षण उप वर्गीकरण करण्यासाठीं उपोषणे धरणे आंदोलन केले, सह्यांची मोहीम आखली मात्र ही लढाई एका जाती पुरती मर्यादित न ठेवता ह्या लढ्याला व्यापक बळ मिळवून देण्यासाठी अनुसूचीत जाती मधील आरक्षण लाभ वंचित मांग, मांग गारुडी,मेहतर,मोची मादगी,चर्मकार डक्कल वार या सर्व वंचित घटकांना सोबत घेऊन व्यापक लढा उभा केला.
अनुचित जाती आरक्षण उप वर्गीकरण हा विषय मंजुर करण्यासाठी सरकारच्या विरोधात भूमिका परखड व स्पष्ट भूमिका मांडत आहेत. सरकार सोबत जाऊन राजकिय राजाश्रय घेतला असता तर चांगले राजकिय पद पदरात पाडून घेता आले असते मात्र सर्व सामान्य जनतेच्या भाकरी खाऊन त्यांच्या न्याया साठी चळवळीला समर्पित झालेल्या या आंदोलकाला ऊर्जा मिळावी म्हणून समाजातील बुद्धिजीवी, स्वाभिमानी,व दानशूर व्यक्तींनी आपले अनमोल सहकार्य करावे व ह्या लढ्याला व्यापक यश मिळण्यासाठी प्रा रामचंद्र भरांडे सर यांना उदंड आयुष्य लाभो हीच या वाढ दिवसांच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा
*“ॲड नितीन पोळ”*
(प्रदेश अध्यक्ष)
लोक स्वराज्य आंदोलन
9860733420
9175894420

