अहमदपूर ( प्रतिनिधी)
भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरही वर्षभर मराठवाडा निजामच्या गुलामगिरीतच खितपत पडलेला होता. मराठवाडा मुक्त करण्यासाठी अनेक भूमिगत चळवळी कामाला लागल्या. काही भूमिगत राहून तर काही उघड उघड बंड करून निजाम राजवटीला विरोध केला. शेवटी भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस कारवाई करून निजाम राजवटीचा पाडाव केला आणि हैदराबाद संस्थानला स्वतंत्रभारतात विलीन केले.असे प्रतिपादन जेष्ठ कार्यकर्ते एन डी राठोड यांनी केले.
अनेक धारातीर्थी पडलेल्या भारत मातेच्या सच्चा सुपुत्रांच्या त्यागातून, ज्ञात – अज्ञात स्वातंत्र्य सैनिकाच्या बलिदानातून मराठवाड्याला मिळालेले स्वातंत्र्य आपण 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा करत आहोत.
अहमदपूर येथील ग्रामीण विकास लोकसंस्था यांच्यामार्फत राष्ट्रध्वजाला सलामी देऊन 17 सप्टें २५ हा हैदराबाद संस्थान मुक्ती दिन साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक तथा ग्रामीण विकास लोकसेवा संस्थेचे कार्यवाहक श्री मच्छिंद्र गोजमे, वसंतराव नाईक ग्रामीण विकास लोकसेवा संस्थेचे अध्यक्ष श्री एन डी राठोड, ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री सुनील खंडाळीकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह श्री हरिदास तम्मेवार आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते .याप्रसंगी श्री मच्छिंद्र गोजमे यांनी स्वलिखीत महात्मा गांधीं, शिवाजी कोण होता आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा इत्यादी पुस्तके उपस्थित सर्वांना भेट दिले.

