अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे)
श्री शिवाजी विद्या मंदीर कंधार येथील माजी मुख्याध्यापक देवीदास वाघमारे यांनी लिहिलेल्या ‘गुराख्यापासून गुरुजी’ या पुस्तकाचे प्रकाशन दि.२१सप्टें २५ रोजी सकाळी ठिक अकरा वाजता सिध्दार्थ नगर कंधार येथे आयोजित करण्यात आले आहे.
‘गुराख्यापासून गुरुजी’ हे पुस्तक प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या समीक्षा प्रकाशनाकडून प्रकाशित करण्यात येत आहे.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री शिवाजी काॅलेज कंधार येथील मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. दिलीप सावंत उपस्थित राहणार आहेत.तर प्रमुख पाहुणे म्हणून देवीदास वाघमारे सर यांचे तत्कालीन सहकारी प्रा.शंकरराव आंबटवाड,प्रा.लिलाताई आंबटवाड उपस्थित राहणार आहेत.
या पुस्तकावर मराठीतील प्रसिद्ध समीक्षक प्रा.डाॅ.ज्ञानेश्वर डाखोरे हे सविस्तर भाष्य करणार आहेत.प्रकाशनानंतर लगेचच कविसंमेलनाचेही आयोजन करण्यात आले आहे.या कविसंमेलनात प्रो.डाॅ.रज्जाक कासार,प्रो.डाॅ.दिलीप सावंत,प्रा.डाॅ.ज्ञानेश्वर डाखोरे,प्रा.भरतकुमार वाघमारे,प्रा.भगवान आमलापुरे, कवी ज्ञानेश्वर गायकवाड, कवी चंद्रकांत ढवळे,कवी युसुफ शेख, कवी राहुल जोंधळे, कवी नाना गायकवाड,प्रा.धनंजय सोनकांबळे,कवी दत्तात्रय एमेकर गुरुजी,कवी पद्माकर फुलशेरे आदी कवी सहभागी होणार आहेत. पुस्तक प्रकाशन समारंभ आणि कविसंमेलन या दोन्ही कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीने केले आहे.


