कंधार ; प्रतिनिधी कंधार तालुक्यातील कुरुळा येथील महाकाली देवी समोरील रोडवरील सर्व अतिक्रमण हाटवणे हटण्यात यावे, जनतेला त्रास होऊ नये,आणि अपघात टळाव रहदारी चांगली व्हावी यासाठी मातंग समाजाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय कंधार समोर दि, 23-09-2025 रोजी पासून आमरण उपोषणाला बसण्यात येणार होते परंतू सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता सुमित पाटील यांनी चार दिवसांत सर्व अतिक्रमण हाटवण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिले असून मागणी ची तात्काळ दखल घेतल्याने उपोषण कर्त्यातून व गावकऱ्यातून समाधान व्यक्त केले जात आहे .
याबाबतीत कुरुळा येथील रहिवाशी यांनी महाकाली देवीचे मंदिर कुरुळा येथील चौकात आहे. ह्या मंदिरा समोर अरुण धुळगुंडे यांनी पानपट्टी टाकुन देवीला जाण्याचा रस्ता अडवला आहे व बाया पोर देवीच्या दर्शनला गेले की गाण्याचा आवाज वाढून पानपट्टीवर टपौरी पोर थांबुन बाया पोराची छेड काढत आहेत. तसेच देवीच्या समोर दारू पिऊन धिंगाणा घालत आहेत .त्यामुळे या महाकाली देवीचे मंदिर अपवित्र करण्याचे काम गावकरी धुळगंडे यांनी पानपट्टी देवी समोर टाकुन केली आहे. आणि महाकठी देवीचे काम अर्धवट राहिले असुन ते पूर्ण करू देत नाहीत. मिस्त्री बांधकामाला गेले की त्याला धमकावत आहे, विटा व रेती जाग्यावर आहे पण बांधकाम करू देत नाहीं. अशी तक्रार गावकऱ्यांनी दि २१ जुलै २०२५ रोजी लेखी स्वरूपात केली होती . व संबंधित बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष घालून झालेले अतिक्रमण काढण्यात यावे असे निवेदन दिले होते.अन्यथा मातंग समाजाच्या वतीने आमरण उपोषण दि २३ सप्टेंबर रोजी करण्यात येणार असल्याचे लेखी दिले होते.त्या निवेदनाची दखल घेऊन दि २२ सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयउप अभियंता सुमित पाटील यांनी सदर उपोषण मागे घेण्यात यावे तुमच्या सर्व मागण्या मान्य होतील असे लेखी आश्वासन दिले .
सदरील रस्ता हा प्रमुख जिल्हा मार्ग 87 दर्जाचा असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचा आहे. तरी आपण आपली पानपटी तात्काळ काढून घ्यावी अन्यथा शासकीय जागेवर अतिक्रमण केल्या बाबत कार्यदेशीर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा बांधकाम विभाग यांनी अतिक्रमण धारकार दिला आहे. यावेळी मारोती मामा गायकवाड, यांच्यासह कुरूळा येथिल मातंग समाजातील असंख्य उपोषणकर्ते उपस्थित होते .