कंधार ;( दिगांबर वाघमारे )
नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने अनेकांचे संसार ही उध्वस्त झाले आहेत.. शासनाच्या वतीने ज्या पद्धतीने पूरग्रस्त व पीडित नागरिकांना या पद्धतीने मदत व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झाली नसल्याने अनेकांचे जीवन विस्कळीत झाले आहे.आजही शेतकरी व सामान्य नागरिक मेटाकुटीला आला असून येणाऱ्या काळात कर्जबाजारीमुळे आत्महत्याचे प्रमाण हे वाढण्याची दाट शक्यता आहे. सध्या दहावी-बारावीची परीक्षा फीस आकारणे चालू असून 2025 26 चे दहावी बारावी वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेतील माफ करून शेतकरी व पीडित कुटुंबांना दिलासा द्यावा अशी मागणी #माजी सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बालाजी चुक्कलवाड #मुख्यमंत्री व #शिक्षण मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन सर्वत्र हाहाकार उडाला आहे अतिवृष्टीमुळे निदी, नाल्याना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आर्थिक संकट ओढावले आहे. अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या मुळे सन २०२५ ते २०२६ या शैक्षणिक वर्षाची १० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांनची परीक्षा शुल्क माफ करा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे दि २५ सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री व राज्याचे शिक्षण मंत्री यांना तहसीलदार कंधार मार्फत व ई मेल द्वारे दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,
नांदेड जिल्ह्यामध्ये यावर्षी तब्बल चार ते पाच महिन्यापासून पाऊस पडत आहे आणि विशेष दुर्दैवाची बाब म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर मध्ये नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन बऱ्याच ठिकाणी ढगफुटी झाली व शेतकऱ्यांचे पिक उध्वस्त झाले पण त्यासोबत शेतकऱ्यांचे पशुधन दगावली आहेत व घरामध्ये पाणी घुसल्यामुळे घरे पण उद्ध्वस्त होऊन काही शेतकऱ्यांना आपला जीव गमावा लागला एकंदरीत ओला दुष्काळच म्हणायला काही हरकत नाही या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेतकरी हा सर्व बाजूने आर्थिक अडचणीत आलेला आहे
म्हणून आपणास माजी सैनिक संघटनेच्या वतीने नम्र निवेदन आहे की शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेऊन यंदाच्या १० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे असे माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी रामप्रसाद चुकलवाड यांनी केले आहे


