नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सर्व स्त्री शक्तीचा जागर आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान व्हावा, त्यांना सर्वत्र समानतेची वागणूक मिळावी.पुरुषाच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात त्या कार्य करत आहेत. त्यांचा त्या कार्याचा सर्वांसमक्ष यथोचित गौरव व्हावा. विधवा,घटस्फोटीत,अनाथ महिलांना आपल्यामध्ये सामावून घ्यावे. त्यांच्या कष्टकरी,श्रमकरी हाताने घटस्थापना व देवीची आरती करून हा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके | शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ||
म्हणून हा उत्सव साजरा करावा. तेव्हाच आपण नारीशक्तीचा गौरव केला. असा त्याचा सरळ सरळ अर्थ होईल.नाहीतर फक्त नवरात्र पुरताच सन्मान करायचा आणि नंतर असमानता दाखवायचं. हे योग्य नाही, त्यासाठीच हा लेखन प्रपंच..डॉ.नरेंद्र दाभोळकरांनी 1989 मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली.आंधळेपणाने एखादी गोष्ट स्वीकारणे म्हणजे अंधश्रद्धा होय.महाराष्ट्र सरकारने 2013 मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचा कठोर कायदा संमत केला. ग्रामीण भागातील पुरुष व महिलांचे साक्षरतेचे प्रमाण अत्यल्प असल्याने जास्तीत जास्त महिला अंधश्रद्धेकडे आपोआप वळतात. चमत्कार,मंत्र,जादूटोणा,पितृदोष, भूतबाधा या गोष्टीला धरून ते बाबा,भगत,बुवा,महाराज यांच्याकडे आकर्षिले जातात.
द्वेष करणाऱ्या गोष्टीला अंधश्रद्धा खत पाणी घालते.उदा.गावात आपणाला मानपान मिळावा,
गटबाजी करता यावी,किंवा प्रतिष्ठेसाठी अंधश्रद्धेचा उपयोग करून घेतला जातो.म्हणून
महिलांनो,भारतीय संस्कृतीमध्ये सण-उत्सव, व्रत वैकल्ये,उपवास
,उपासना,तप,आराधना यांची वर्षभर रेलचेल चालत असते. त्यातील योग्य काय? अयोग्य काय आहे.ते समजूतदार पणाने तुम्ही
घ्यावे.तरुण मुलींनी स्पर्धा
परीक्षेचा नित्यनेमाने अभ्यास करावा.तेथे तुम्हाला अंधश्रद्धेवरील कोणतेच प्रश्न विचारले जाणार नाहीत.सर्व प्रश्न तुम्हाला वैज्ञानिक दृष्ट्या महत्त्वाचे विचारले जातात.
याचे थोडे नैतिक भान ठेवावे. कोणत्याही काल्पनिक घटनेचा व सूर्य-तारे यांचा अंधश्रद्धेशी अभंग जोडू नये.विज्ञाननिष्ठ जीवन जगा.
ज्ञानाचा टिळा तुमच्या कपाळी असू द्या.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी ज्ञानाचा टिळा भाळी लावला आणि त्या पहिल्या मुख्याध्यापिका झाल्या.प्रियदर्शनी इंदिरा गांधी या पहिल्या पंतप्रधान, प्रतिभाताई पाटील या पहिल्या राष्ट्रपती,
आनंदीबाई जोशी या पहिल्या डॉक्टर,सूचिता कृपलानी या पहिल्या मुख्यमंत्री झाल्या.
सुनीता विलियम्स,कल्पना चावला या अंतराळ यात्री झाल्या.कर्नाम मल्लेश्वरीने ऑलम्पिक मधून भारताला पदक मिळवून दिले. असा मान तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ताठ मानाने शिक्षण शिकावे .
कसल्याही पद्धतीची अंधश्रद्धा घरात,दारात,मनात बाळगू नका.
जे काही तुम्हाला दान द्यायचे आहे.
ते तुम्ही विद्यालयाला किंवा दवाखान्याला नेऊन द्या.
इतर ठिकाणी दिलेले दान सत्कारणी लागत नाही.
सूर्य,चंद्र,तारे या वैज्ञानिक घटना आहेत.सूर्यग्रहण,चंद्रग्रहण याची तुम्ही आपल्या रोजच्या व्यवहाराशी संबंध जोडून जास्त अंधश्रद्धाळू होऊ नका.वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास धरावी.त्यामुळे तुमचे जीवन सुखकर होईल. पायात चपला न घालणे,पायी प्रवास करणे,जटा वाढवणं,अंगात येणे,मोक्षाच्या कल्पना करणे, अंगारे-धुपारे करणे,स्वर्ग-नरक या विषयी मनात भीती बाळगणे. अंगाला राख फासणे,वारानुसार रंग बदलणे.छूमंतर करणे.पाणी मंतरून देणे.भुताखेताच्या, प्रेताच्या,पिशाच्च यांच्या
भयानक गोष्टी सांगितल्या जातात. म्हणून महिलांनो तुम्ही या
गोष्टी सोडून द्याव्यात.आज पर्यंत जीवंत माणूस स्वर्गात गेला नाही आणि स्वर्गातील जीवंत माणूस खाली पृथ्वीवर आला नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रगतीला आड आण्यासाठी काही चतुर लोकांनी अंधश्रद्धेचे बीज मनात पेरुन आपणाला आपल्या दैनंदिन कार्यापासून बाजूला ठेवले. कित्येक देवदासी,मुरळ्या, नृत्यांगना, आराध्या,आपले सुंदर जीवन जगण्याचे सोडून देऊन नंतरच्या काळात अतिशय दुःखाने ग्रासल्या. जो पर्यंत अंगात शक्ती आहे.तो पर्यंत कसे तरी कुठे तरी आश्रय घेऊन राहता येते.
परंतु आपलं वयोमान वार्धक्या कडे गेले की,सगळीकडं आपली दैन्य अवस्था निर्माण होते.
हे प्रत्येकीने आपापल्या मता नुसार ठरवावे.आपल्या आई-वडिला शिवाय तुम्हाला कोणीही इतर व्यक्ती येऊन मार्गदर्शन करणार नाही. हे त्रिकाल सत्य आहे. हे तुम्ही ध्यानी धरावे,नवसा सायास पुत्र होती.| तर मग का करावे लागे पती.
असे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हटले आहे.
नवस करून काही उपयोग होत नाही. हे विज्ञान सांगते. तुम्हाला जर समाजात प्रतिष्ठा मिळवायची असेल तर शिक्षण शिका,नाही तर इतके अनर्थ एका अविद्येने केले. असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी म्हटले आहे.त्यांचे ऐका आणि वर्तनात परिवर्तन करा. तेव्हाच शिक्षणाचा दर्जा उंचावला असे म्हणता येईल. शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी आली. परंतु आपल्या मनातील अंधश्रद्धा
जवळ आली.
विज्ञानाच्या बाजूनं चला.तुमच्यात प्रगती होते. विशिष्ट जमातीच्या लोकांच्या अंगात येते.त्यांना देव दिसतो असे अनेक उदाहरणाचे सर्वे करून आम्ही पाहिले आहेत. त्यात हिंदू धर्म एक नंबर वर आहे. धर्माच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारून लोकांनी करोडो रुपये कमावले. सत्यनारायण कथाची पुस्तके विकून लोकांनी बंगले बांधले. पण अनेक भोळ्या भाबड्या बायका उपासना,
उपवास, गुरुवार करून वास्तविक जीवनात पाठीमागे राहिल्या. उपवासामुळे काही महिलांच्या
अंगात रक्त कमी पडले.काही निरक्षर लोकांना धर्माची भीती घातल्याने ते अज्ञानी राहिले.
आता काळ बदलला.
सुज्ञ नागरिकांनी अंधश्रद्धेवर कसलाही विश्वास ठेवू नये.
पैशाचा पाऊस पाडणे ही शुद्ध फसवणूक आहे.तो स्वतः एवढा गरीब का राहिला.याचे उत्तरे आपण शोधावी.अनेक भाकड कथा,दंतकथा,पौराणिक कथा, अतिशोक्ति पर कथा सांगून अनेकांना लुटण्यात आले. अंधश्रद्धा पसरणाऱ्या तुम्ही कोणत्याही ढोंगी बाबा,महंत,बुवा यांच्या नादी न लागता.सद्सद्बुद्धीने वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास धरावी. सगळेच साधुसंत वाईट नाहीत, हे सुद्धा आपल्या मनात असू द्या.तुमच्या मुलांबाळा वर संस्कार चांगले करा.महिलांच्या हातामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. मुलं/मुली तुमची अनुकरणप्रिय असतात.अंधश्रद्धेच्या नावाने वा-या करु नयेत.चुकीची माहिती सांगून वैचारिक क्षमता कमी होऊ नयेत.याची काळजी घ्यावी. सोमवार ते रविवार पर्यंत सगळे वार सारखेच आहेत. सर्व नद्यांचे पाणी सारखंच आहे. वृक्ष सर्वांना सारखीच सावली देतो. चंद्र सर्वांना शितलता देतो.
हे तुमच्या मुलांना शिकवावे. अंधश्रद्धेला मानणाऱ्या
समाज कंटकांनी आज पर्यंत अनेक चुकीच्या गोष्टी सांगून समाजाला लुटण्याचा प्रयत्न केला. गॅलिलिओला सुद्धा लोकांनी वेडा ठरवले आहे.दिनांका नुसार चालावे.
तिथी ही बँकेत चालत नाही. म्हणून महिलांनो, तुम्ही एकत्रित या.तुमच्या मर्जीने चांगल्या व्यवसायाला सुरूवात करा.परंतु कोणाच्या भाकड कथा ऐकून नका.आपला अमूल्य वेळ वाया घालू नका. या देशातील चतुर व उच्चवर्णीय लोकांना शिवाशिव चालत नाही.परंतु
पैसा,दागदागिने,जमीन चालते. माणसाचा स्पर्श नको असतो.
मात्र गाईचे मूत्र चालते.घरात कुत्रा, मांजर, शेळ्या मेंढ्या चालतात
,परंतु दलित व्यक्ती चालत नाहीत.
असा या ठिकाणचा दुर्दैवी माणुसकीला काळिमा फासणारा इतिहास आहे.येथे दगडाच्या मूर्तीवर तेल,दुध टाकून पूजा केली जाते.परंतु मुलाबाळांना दूध पिण्या साठी दिले जात नाही. ही आजही शोकांतिका आहे.
हे या ठिकाणी सांगावे वाटते. अनेक ठिकाणच्या दानपेट्या चोरांनी फोडल्या आहेत. त्यामुळे तरुण-तरुणींनी अंधश्रद्धेच्या नादी लागून आपलं उभं आयुष्य वाया घालत आहेत. डाॅ. नरेंद्र दाभोळकर यांना समाजकंटकांनी अंधश्रद्धेच्या प्रकरणात यमसदनी पाठवले आहे. त्यामुळे तुम्ही पैसा कमावण्यासाठी कुठेही जाऊन नृत्य करणे. हिडीस-फिडीस प्रकार करून पैसा जमवणे हे करू नका. यामुळे तुमचं महत्त्व कमी होईल. तुम्हाला रणचंडिका,दुर्गा,शारदा रेणुका,
भवानी,यमाई, सप्तशृंगी, आदीमाया शक्ती, महालक्ष्मी, यल्लमा,एकवीरा,जगदंबा अशा विविध नावाने संबोधले जाते. तुमच्या हातून राक्षसांचा वध करण्यात आलेला आहे. तुमच्या हातात शस्त्र आहेत.त्यामुळे तुम्ही अंधश्रद्धेचा टिळा कपाळावर अजिबात लावू नका.तुम्ही ज्ञानाचा टिळा कपाळावर लावा.मोठमोठ्या पदव्या मिळवा.तर तुमच्या घरात सुख,शांती,समाधान नांदेल.
तुमचा उपयोग कोणत्याही संघटना,समाज घटक करून घेऊ नयेत, कारण अंधश्रद्धेच्या नावाखाली अनेक महिलांना पैशाचे आमिष दाखवून वाईट मार्गाकडे वळविले जाते.अनेक चित्रपटातून,मालिकेतून महिलांना थप्पड मारून अपशब्द बोलून इज्जत कमी केली जाते.आपण शैक्षणिक दृष्ट्या कमकुवत असल्या नंतर कोणीही आपल्याला टाकून बोलते.तुम्ही जर झाशीची राणी लक्ष्मीबाई,ताराबाई शिंदे,रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई,पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, वीरमाता जिजाऊ,महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई,माता रमाई, आदर्श माता मदर तेरेसा हजरत महल, कल्पना दत्त, राणी दुर्गावती यांचा आदर्श घेऊन जीवन जगले तर तुमच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची ताकद कोणाची होणार नाही ही वास्तविकता आहे. त्यासाठी ज्ञानवंत,गुणवंत,प्रज्ञावंत व्हावे आणि आपल्या कुटुंबाला सुद्धा शिक्षित करा.त्यामुळे आपले जीवन फलदायी होईल,नवरात्र उत्सवा मधून विधायक कामे केले जावेत. महिलांना सन्मानित करून पुढील पिढीसमोर त्यांचा आदर्श ठेवावा.गुणी महिलांना पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सत्कार करावा. त्या पुरुषांच्या बरोबरीने कार्य करू शकतात.नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या
दुर्गाना विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेडच्या वतीने खूप खूप शुभेच्छा.शब्दांकन
प्रा.विठ्ठल गणपत बरसमवाड
अध्यक्ष विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि.नांदेड

