कंधार ( दिगांबर वाघमारे )
राज्यात माहे जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांसाठी शासनाने विशेष पॅकेज, मदत व सवलती जाहीर केल्या आहेत. मात्र, या शासन आदेशात नजरचुकीने नांदेड जिल्ह्याचा समावेश राहिला नव्हता.
या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. श्री. अजितदादा पवार व मदत व पुनर्वसन मंत्री मा.ना. श्री. मकरंदआबा पाटील यांच्याशी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दूरध्वनीवर सविस्तर चर्चा केली आहे.
या चर्चेनंतर लवकरच नांदेड जिल्ह्याचाही समावेश असलेले शासन आदेशाचे शुद्धीपत्रक जाहीर होणार असल्याची माहिती आमदार चिखलीकर यांनी दिली.
नांदेड जिल्ह्यातील शेतकरी व पुरग्रस्त नागरिकांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.

