जगातील सर्वात जुने शैक्षणिक विद्यापीठ म्हणून तक्षशिला विद्यापीठांस ओळखले जाते.या विद्यापीठातून 64 वेगवेगळ्या विषयाचे शिक्षण दिले जात होते.खगोलशास्त्र, विज्ञान,आध्यात्म शिकवले जात असे.सध्या हे ठिकाण पाकिस्तान मधील इस्लामबाद जवळ आहे. मध्य आशियातील व्यापारी केंद्र म्हणून त्याची ओळख आहे. तेथूनच बंगालच्या उपसागराकडे जाणारे रस्ते,तसेच अफगाणिस्तान मधील सुमेरियन पर्यंत मार्ग जातात. हे विद्यापीठ कोणत्याही ठिकाणी असले तरीही या विद्यापीठाची कीर्ती कमी होणार नाही.या विद्यापीठात अनेक राजपुत्र,धनिकांची मुले,शास्त्रज्ञ,व्याकरण कार,आर्य चाणक्य यांनी अभ्यास करून आपापल्या क्षेत्रात आकाशा एवढं महान कार्य केलेले आहे.
शिक्षण हे सर्वांगीण सुधारण्याचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारा जवळच परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना विद्यापीठांमध्ये प्रवेश दिला जात असे. म्हणून तर’ विद्याधन’ हे जगातील सर्वश्रेष्ठ धन आहे. भारतातील अति महत्त्वाची शिक्षणाचं केंद्रस्थान म्हणून तक्षशिलेच नाव अजरामर झाले आहे. प्राचीन भारतातील विक्रम शीला, कांची, वल्लभी यापेक्षाही नावाजलेले तक्षशिला विद्यापीठ वरच्या स्थानावर आहे.
या ठिकाणचे व्यापारी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय शहरांशी जोडले गेले होत. शांतिदूत तथागत गौतम बुद्ध यांच्या समकालीन असलेला ‘जीवक’नावाचा वैद्यक याच विद्यापीठात शिक्षण घेऊन मोठा झाला.आयुर्वेदामध्ये त्यांनी महत्त्वाचं कार्य केले आहे. आयुर्वेदामध्ये रोगाची लक्षणे, निदान,उपचार या गोष्टीचा विचार केला आहे. हा रोग होऊ नये म्हणून काय करता येईल.
याचा विचार ही यामध्ये केला आहे.सम्राट बिंबिसारच्या दरबारात ‘जीवक’हा प्रसिद्ध वैद्यक होता.
सोळा महाजन पदांपैकी मगधच्या साम्राज्या तील सर्वश्रेष्ठ सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे ही शिक्षण तक्षशिला विद्यापीठात झाले. त्यांना आर्य चाणक्या सारखे विद्वान गुरुनी मार्गदर्शन केले. त्यांनी कौटिल्य हा ग्रंथ लिहिला.
व शपथ घेतली होती.”नंद कुळाचा नाश केल्याशिवाय मी शेंडीला गाठ बांधणार नाही”अशी भीष्मप्रतिज्ञा आर्य चाणक्यांनी प्रत्यक्ष वास्तवात आणली.सम्राट चंद्रगुप्त मौर्यानी नंद घराण्याचा नायनाट केला. कारण धनानंदानी आर्य चाणक्याचा भर दरबारात अपमान केला होता. त्याचा बदला सम्राट चंद्रगुप्ताच्या मदतीने घेतला.भारतीय व्याकरण कार म्हणून गाजलेले प्रसिद्ध व्यक्ती पाणिनि यांनी ‘अष्टाध्यायी’हा ग्रंथ लिहिला.सम्राट बिंबिसारच्या दरबारात ‘जीवक’ प्रसिद्ध वैद्य होता. त्यांनी चरक संहिता हा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये त्यांनी चिकित्साशास्त्र व औषध शास्त्र यांची माहिती अतिशय चांगल्या पद्धतीने लेखन केले.चरक हे वैद्य सुध्दा याच विद्यापीठातून शिकून विद्वान झाले.त्यामुळे या विद्यापीठात वैदिक वाङ्मय,बौद्ध तत्त्वज्ञान,तर्कशास्त्र,अर्थशास्त्र यांची माहिती मिळते.जगज्जेता सिकंदराच्या बरोबरीच्या काळात असलेल्या इतिहासकांराने या विद्यापीठाचे वर्णन अतिशय चांगले केले आहे. ग्रीसमध्ये अशा प्रकारचे विद्यापीठ अस्तित्वातच नव्हते. असे त्यांनी त्यांच्या साहित्यात लिहून ठेवले आहे. इसवी सन 400 च्या सुमारास चिनी बौद्ध भिक्खू फाहियान भारतात आला होता. त्यावेळी त्यांनी तक्षशिला विद्यापीठाला भेट दिली,त्या भेटीमध्ये त्यांनी या विद्यापीठांचा अतिशय गुणगौरव वास्तविकपणे केलेला आहे. म्हणूनच या विद्यापीठाची ख्याती सर्वत्र पसरली होती. येथे दहा हजार विद्यार्थी जगभरातून अध्ययना साठी येत असत. त्यांना शिकवण्यासाठी सोळाशे पंडीत त्यांना शिक्षण देत असत. खरोखरच सध्या अशा विद्यापीठांची गरज आहे.
आपल्या देशातील विद्यापीठांने कागदाच्या भेंडोळ्या विद्यार्थ्यांना न देता विद्यार्थी तावून-सुलाखून अभ्यासू बनवावेत.विद्यापीठां
मध्ये आदरयुक्त दरारा असावा.राजकारणाचा विद्यापीठावर कसल्याही प्रकारचा दबाव नसावा. कुलगुरू हा सर्वसमावेशक, मानवतावादी,वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगणारा असावा.त्यांच्या अंगी संघटना चातुर्य,अभ्यासुवृत्ती, वक्तशीरपणा,नीटनेटकेपणा,
सर्वधर्मसमभाव असावा. त्यांनी
विद्यार्थ्यांत अभ्यासू वृत्ती ठेवून विद्वान बनवावेत.होतकरू, कष्टकरी अशा विद्यार्थ्यांना भरघोस शिष्यवृत्ती द्यावे.विद्यापीठांमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणांची कदर विचार मंथनातून करावी.तरच महाराष्ट्रातील विद्यापीठांची देशात चर्चा होईल.विद्यापीठाचे नाव बदलले म्हणून विद्यापीठाचे महत्त्व कमी होऊ नये. विद्यापीठ हे सर्वांना सारखेच आहेत.याचे भान सर्वांना असावे. विद्यापीठाचे नाव काय आहे ? यापेक्षा विद्यापीठात काय काय शिकवलं जाते. त्याचा संदर्भ जीवनाशी जोडला जावावा.असे मला वाटते.परत तक्षशिले सारख्या विद्यापीठांची प्रेरणा घेऊन गुणवंत विद्यार्थी घडवावेत. देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी शिक्षणाचे महत्त्व जाणून घ्यावे. तेव्हा प्रगल्भ समाज देशाची संपत्ती म्हणून नावारूपाला येईल. जागतिक संस्कृतीचे संगम करणारे ठिकाण म्हणून तक्षशिला आजही वरच्या स्थानावर आहे.त्याचे अनुकरण आपल्या देशातील सर्व शैक्षणिक विद्यापीठांनी करावे.
ही अपेक्षा…शब्दांकन
प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपतराव
अध्यक्ष :विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि.नांदेड

