अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांनी सर्व मानव समान आहेत.असा जाहीरनामा काढला तसेच दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी सर्व मानव समान आहेत.
असे प्रतिपादन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटने मध्ये समतेचे तत्व सांगितल्यामुळे त्यांचा जन्मदिन समता दिन म्हणून साजरा केला जातो.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सर्वांना समान अधिकार आहेत. असे म्हटले. राजर्षी शाहू महाराजांनी मानवतावाद शिकवला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती तील सवंगड्यांना एकत्रित करून स्वराज्य स्थापन केले.सर्वच संतांनी वारकरी संप्रदायां मध्ये भेदाभेद अमंगळ आहे.
असे स्पष्ट सांगितले. साने गुरुजींनी सर्वांना प्रभूची लेकरे म्हटले.तरीही दलित जाती वरचे हल्ले आज थांबत नाहीत.
ही चिंताजनक बाब झाली आहे. त्यासाठीच हा लेखन प्रपंच..
माणसाने माणसाशी माणसा प्रमाणे वागावे. लोकशाही मध्ये सर्वजण समान आहेत. कोणीही उच्च-नीच्च नाही. असे आपण नेहमी ऐकतच आलो आहोत. आज समाजात तेढ निर्माण करून माणसाला तुच्छ लेखले जाते. माणसा माणसांमध्ये भेदभाव केला गेला. एक माणूस चांगला, दुसरा माणूस वाईट असे ठरवून माणूस माणसाचा वैरी बनतं आहे. आपण सर्व गुण संपन्न आहोत. दुसरे व्यक्ती नीच्च आहेत.असे दाखवून सतत अपमानास्पद वागणूक देण्यात येत आहे. वर्ण व्यवस्था निर्माण करून जातीयता वाढली आहे. महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेत जात असताना त्यांना रेल्वेच्या डब्यातून उतरून टाकण्यात आले.
कारण तुम्ही कृष्णवर्णीय आहात एवढ्या मोठ्या व्यक्तीला अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्यांचे काय?असा प्रश्न निर्माण झाला.असं काय केलं जाते. संत तुकाराम महाराजांनी अभंग रचले ते अभंग त्यांना इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकण्यास सांगितले. यावरून काय बोध घ्यावा.का असं केले ?याचा विचार आपण कधी केलाय काय? मागासवर्गीय समाजावर दररोज कुठे ना कुठे काही घटना घडत आहेत.दलित समाजावर अनेक ठिकाणी अन्याय,अत्याचार केला जातो.सर्व चुका दलितांच्या काढल्या जातात. इतर लोक चुका करत नाहीत काय? हा संशोधनाचा विषय आहे. अल्पसंख्याक समाजावर हल्ले करून आपल्या मनातील रोष, खदखद,जलशीपणा बाहेर येतो. दलित समाजातील व्यक्तीने शिकवूण विद्वान झाला तर त्याला चांगले म्हणण्या ऐवजी दोष दिला जातो. हे कुठेतरी थांबायला हवं. मनुस्मृतीने महिलांना तुच्छ लेखले. ज्या महिलांपासून मानव जन्म घेतो. त्यांनाच आपण अपवित्र मानतो.असा तिटकारा का निर्माण झाला. भारतीय राज्यघटनेने सर्वांना समान हक्क दिले आहेत. स्त्री -पुरुष समानता दाखवली आहे. तरीही अनेक लोक हे मानायला तयार नाहीत. समाजा-समाजामध्ये जातीवरून भेदभाव होत आहेत.सुशिक्षित लोकांपासून जातीचा जास्त वाढत आहे असे निदर्शनास आले आहे.
कोणाचाही विश्वास कोणावर आता राहिला नाही? प्रत्येक जातीचा आता झेंडा वेगळा होत आहे.एकमेकांना असमान मानले जात आहे. कोणता झेंडा हाती घेऊ असे म्हणायची वेळ आली आहे.
आज दलित समाज शिक्षणाच्या जोरावर तू पुढे गेला आहे.
तो कोणाची स्पर्धा करत नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेबांनी सांगितलेल्या तत्त्वानुसार तो पुढे जातो. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य साहित्यातील अतिशय महान आहे. परंतु त्यांना आजतागायत भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही याची खंत वाटते.
क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुलेंनी एवढे अनर्थ एका अविद्येने केले म्हटले.आणि समाज शिक्षणाकडे वळला. महिला शिकल्या आणि देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत गेल्या. राजर्षी शाहू महाराजांनी सर्वांनी शिकावं म्हणून समाजाला शहाणं केलं.दलित समाजातील लोकांना आपल्याजवळ घेऊन त्यांना मानवता शिकविले.
दलित लोकांच्या हॉटेलमध्ये बसून चहा घेतला.ही गोष्ट काही लोकांना खटकली.आज विचार करण्या सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जातीवाद वाढत आहे. ग्रामीण भागामध्ये आजही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झाल्यानंतर ही दलित समाजावर अन्याय, अत्याचार, जीवघेणे हल्ले चालूच आहेत.
हे मनातील सल आणखी ही काही लोकांच्या मनातून गेली नाही
.स्वतःच्या कर्तृत्वातून मोठ्या झालेल्या लोकांच्या अंगावर शाही फेकणे, वाहना फेकणे, शिवी देणे. धक्काबुक्की करणे,अपमानित करणे या गोष्टी महासत्तेकडे जाणाऱ्या आपल्या देशाला भूषणावह नाहीत.सर्व क्षेत्रात जातीयता निर्माण झाली आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा जातीचा तिटकरा केला जातो. दलित लोकांना महत्त्वाचे स्थान दिले जात नाही
.त्यांचं कर्तृत्व पाहिले जात नाही. इतरांना मात्र डोक्यावर घेऊन नाचविले जाते. ही समाज व्यवस्था मानवतेच्या बाजूने चालत नाही. प्रत्येक दलित व्यक्ती कोणते ही क्षेत्र असो. त्यामध्ये आपलं जीव ओतून तो काम करतो. कारण तो धनदांडगा नाही, त्याच्याकडे कसल्याही पद्धतीची संपत्ती नाही.
तो आयुष्यात आराम करत नाही. म्हणून दिवस रात्र, श्रम करून अभ्यास करून वेगवेगळ्या पदावर विराजमान होतो.आणि त्यांचे स्वप्न रंगवतो .पण काही दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी त्याचे हे पद पहावे वाटत नाही. त्यामुळे त्याच्या पाठीमागे कोणती तरी साडेसात्ती लावून खेळ कसा करता येईल याचा विचार अनेक ठिकाणी केला जात आहे. निवडणूकीसाठी मागासवर्गीय लोकांना जवळ केले जाते परंतु ते सत्ते मध्ये नको असतात. त्यांना दलित समाजाचा तिटकारा करतात. याची कारण आम्ही एक आहेत. शिकलेल्या महिलांना त्रास देणं आडनावा वरून अंदाज काढून बोलणं, दलित महिलांचे लैंगिक शोषण करणे.अनेक गोष्टी सवर्णां कडून केल्या जात आहेत.अनेक नेत्यांनी मागासवर्गीयांना त्रास दिला आहे. हे कधी थांबणार ?कोणतीही घटना घडते वेळी मागासवर्गीया वरच जास्त हल्ले होतात.हे चिंताजनक बाब झाली आहे. घटनेच्या अधिकारामुळे आज राष्ट्रपती महिला आहेत. सर न्यायाधीश पदी नामवंत दलित न्यायाधीश आहेत
ही त्यांच्या जातीची ताकद नसून कर्तृत्वाची ताकद आहे. हे ओळखून घेऊन वागावे. व्यक्ती कोणत्या जातीचा आहे. हे ना पाहता कर्तृत्वावरून व्यक्तिमत्व ठरते.ही गोष्ट आणखीही सवर्णाच्या डोक्यातून गेली नाही. ग्रामीण भागामध्ये तर दलित लोकांना जीवन जगणं अनेक ठिकाणी सवर्णाने मुश्किल केले आहे. दलित हुशार विद्यार्थ्यावर अनेक आरोप केले जातात. हा असंतोष प्रत्येक दलिताच्या मनात खदखदत आहे. त्याचा शेवट कसा होईल. याचे उत्तर कोणालाही सांगता येणार नाही. मात्र भारत हा काल्पनिक धर्मनिरपेक्ष देश आहे. अशी म्हणण्याची वेळ येऊ नये म्हणजे झाले.शब्दांकन
प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत
अध्यक्ष: विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि.नांदेड

